आपला ई पेपर/online/परळी प्रतिनिधी
Railway / उड्डाणपुलाच्या दुरुस्ती चे काम दिनांक 26 मे पासून सुरू करण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग लातूर यांनी दोन दिवसापूर्वीच पत्र जारी करून माहिती दिलेली आहे. त्या अनुषंगाने हे काम दिनांक 26 मे पासून पुढे एक महिना म्हणजेच 30 जून पर्यंत सुरू राहणार आहे. परंतु उड्डाण पुलावरील वाहतूक बंद करण्याबाबतच्या निर्णयात अंशतः बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता पुढील सहा दिवस म्हणजेच 31 मे पर्यंत उड्डाण पुलावरील वाहतूक सुरू राहणार आहे. एक जून नंतर मात्र संपूर्णतः उड्डाणपुलावरील वाहतूक बंद असणार आहे.
शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल दुरुस्तीच्या कारणामुळे २६ मे ते ३० जून या कालावधीत वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन लातूर राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या वतीने केले आहे.
उड्डाणपुलावर पडणारे खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. समाजमाध्यमांवरही यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची मागणी गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांकडून होत होती. अखेर प्रशासनाने या पुलाच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे.
पर्यायी रस्त्यांचा वापर करा
दुरुस्तीच्या कालावधीत अपघात किंवा अडथळे येऊ नयेत, यासाठी वाहतूक टोकवाडीमार्गे परळीच्या दिशेने वळवण्यात येणार आहे. बीड, गंगाखेड, परभणी आदी भागांहून परळीकडे येणाऱ्या वाहनधारकांनी परळी बायपास रोडचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा. ही मार्ग व्यवस्था दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत (३० जून) लागू राहील. वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अभियंता श. म. उरगुंडे यांनी केले आहे.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे
टोकवाडी - कन्हेरवाडी - परळी बायपास रोड
बीड - तेलगाव - परळी बायपास मार्ग
Social Plugin