Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सरस्वती नदी वरील संरक्षण कठडे तात्काळ बसवावेत - किरण धोंड

आपला ई पेपर परळी 


परळी नगर परिषद प्रशासन  नागरिकांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.शहरातील जुन्या गावभागातील असलेल्या सरस्वती नदीवरील तुटलेले कठडे तातडीने दुरुस्त अथवा नवीन बांधकाम करावेत अशी मागणी नगर परिषद प्रशासनाकडे सामाजिक कार्यकर्ते किरण धोंड यांनी केली आहे.

अंबेवेस ते नेहरू चौक आणि गणेशपार ते राणी लक्ष्मीबाई टॉवर कडे जाणाऱ्या दोन्ही रस्ते नेहमी वर्दळीचे असतात.या रस्त्यांवर सरस्वती नदीचे पूल आहेत.मात्र या पुलाला कठडे नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.गेले कित्येक दिवसांपासून हे कठडे तुटलेले आहेत याकडे नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. 

या ठिकाणी अनेक लहान मोठे अपघात झालेले आहेत तसेच महाशिवरात्री नंतर निघत असलेल्या पालखीचा मार्ग देखील असल्याने लवकरात लवकर हे काम करण्यात यावे अन्यथा उपोषण करण्याचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते किरण धोंड यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या