आपला ई पेपर | परळी | प्रतिनिधी
राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातले उपोषण आंदोलन सुरू केले आहे. त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यामुळे मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सकळ मराठा समाजाच्या वतीने उभ्या महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे. याच अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चा परळी वैजनाथ यांनी दि १४ फेब्रुवारी रोजी परळी बंद ची ही हाक देण्यात आली आहे.
दि १३ फेब्रुवारी रोजी परळी, व संभाजीनगर पोलीस स्टेशनला याबाबदचे निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यासह परळी कडकडीत बंद राहणार आहे. सर्वांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा परळी वैद्यनाथ च्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या