Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Blog by Nana Patekar. Everyone MUST read completely.. Its too good & Realistic...


आजच्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख आहे

A very nice article written by Nana Patekar  in his blog

खरोखरच हि माहिती लहान मुलांना दाखवा आणि तुम्ही सुद्धा वाचा..

Blog by Nana Patekar.  Everyone  MUST read completely.. Its too good & Realistic...

एक पिढी शिक्षण घेऊन
गाढव बनली आणि आता
नवी पिढी शिक्षण घेताना
रेसचा घोडा बनत आहे.

परीक्षेत १००% पाहिजेत,
कराटे क्लासमध्ये Black
बेल्ट मिळवायचा आहे.
त्यानंतर Dance क्लास
attend करायचा.
भगवतगीता स्पर्धेत जायचं
आहे. श्लोकांचा अर्थ कळला
नाही तरी ते तोंडपाठ
करायचेच.
कारण first prize मिळालंच
पाहिजे !!
मग drawing competition असते.
तिथून बाहेर निघाला की
चालला तबला वाजवायला...
संगीत विशारद बनायला.

Albert Einstein बनवून
देणाऱ्या Multi -National
School आल्या. पण
Albert हा Einstein
बनण्यासाठी शाळेत गेला
नव्हता.
एक अमिताभ बनला तर
हजारो acting school
उभ्या राहिल्या.
पण अमिताभ अभिनेता
बनण्यासाठी कोणत्याही
School मध्ये गेला नव्हता.
आता लवकरच मोदी तयार
करणाऱ्या शाळा उभ्या
राहतील. आणि पालक
लाखो रुपये फी भरून
त्यात मुलांना पाठवतील.
आज मुलाच्या शिक्षणासाठी
जेवढा खर्च एका वर्षाला होतो,
तितके रुपये त्याच्या
पालकांना संपूर्ण शिक्षण
घेण्यासाठी सुद्धा लागले
नाहीत.

आता शाळा सुरु केल्या
आहेत investors नी.
मागणी तसा पुरवठा ह्या
तत्त्वावर. पालकांना
आपल्या मुला-मुलीला
रेसचा घोडा बनवायचं आहे,
ही मागणी पाहून जास्तीत
जास्त अभ्यास मुलांच्या
डोक्यात कोंबायला सुरुवात
केली. दप्तराचं आणि
पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं
ओझं वाहणारी मुले म्हणजे
चालती बोलती प्रेते बनत
चालली आहेत.
जरा शुद्धीवर आली की
"what is square of 12?" असं विचारून त्यांचं बालपण
चिरडून टाकतात.

श्री मोदी ह्यांनी मुलांना एक
प्रश्न विचारला होता-"
तुमच्यापैकी किती जण
घाम गळेपर्यंत खेळतात?"
तेव्हा एकाही मुलाने हात
वर केला नाही.
कारण आता मुले AC मध्ये
जन्म घेतात, AC मध्ये
वाढतात. चिप्स खातात,
soft ड्रिंक पितात आणि
mobile वर game
खेळत बसतात.
ऊन, पाऊस, वारा
ह्याच्याशी संबंध येत नाही.
पडणं-लागणं, खेळात हरणे
माहीतच नाही.
School bus आली नाही
तर शाळेपर्यंत चालत
जाण्याची ताकद मुलांमध्ये
नाही.
वय वर्ष ६ पार होत नाही तर
डोळ्याला चष्मा लागतो.
हात पायांच्या एक तर
काड्या होतात नाहीतर
लठ्ठपणा वाढतो.
कारण शारीरिक कष्ट संपले
आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein
मिसळलेले पदार्थ खाणे
सुरु झाले. ह्या
ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात
शिरून जास्त काळ टिकतात
आणि पोटातील पोषके
शोषून घेतात. मुलांची
hormonal आणि
जैविक वाढ रोखतात.
ज्यामुळे मुले दुबळी होत
जातात. हे घटक
पिझ्झा-बर्गरमध्ये असतात.
म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक
रुग्ण असलेला देश बनणार
आहे. सोबत इतरही
विकार येत आहेत.

शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ,
बाजरी, सुका मेवा आणि
फळे ह्यात घातक ingredients नसतात.
लापशी, सातू, शिरा, पोहे
किंवा अंड्याचे घरी बनवलेले
पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात.
ते मिळत नसल्यामुळे
मुलांची शारीरिक वाढ
नीट होत नाही. प्रतिकार
क्षमता संपते. मग
vitamins , DHA , minerals देणारे product
विकत आणून ते खायला
देतात. वास्तविक, शरीर हा
जगातील सर्वात मोठा
कारखाना आहे. ह्याच
शरीराला योग्य आहार, कष्ट
मिळाले तर कुठेही तयार न
होऊ शकणारं रक्त
तयार होतं. साध्या भाज्या,
अस्सल भारतीय जेवण
मिळालं की शरीराची
यंत्रणा स्वतः काम करते.
म्हणून ताज्या भाज्या,
भाकरी खाणारी आणि
मिनरल्स, calcium ,
proteins माहीत नसलेली
माणसे १०० वर्षे जगली
आणि हे माहीत झालेली
माणसे फक्त ६० वर्षे
जगतात…तेही अनेक रोग
सोसत, औषधे घेऊन !!

खेळ, व्यायाम, भटकंती
आणि दर्जेदार वाचन न
केल्यामुळे मुलांना मानसिक
कमतरता जाणवते.
संघर्ष माहीत नसतो
आणि team work
कळत नाही. मित्र फक्त
WhatsApp , face बुक
वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही.
सुख-दुःखाची
देवाण-घेवाण नाही
आणि मित्राचा-मैत्रिणीचा
मानसिक आधार नाही.
दिलखुलास हसणे आणि
ओक्साबोक्शी रडणे
मानसिक आरोग्यासाठी
चांगले असते. ह्या दोन्ही
क्रिया मुलांना करता येत
नाहीत. आपोआपच, जरा
मनाविरुद्ध घडलं की
लहान मुले-मुली आत्महत्या
करतात. बरीच एकुलती
एक मुले दुसर्याशी जमवून
घेण्याची सवय नसल्यामुळे
पुढे लग्न झाल्यावर
वर्षभरात घटस्फोट घेतात.
ज्या मुलांना बहीण नसते,
चांगली मैत्रीण नसते
त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा
दृष्टिकोन संकुचित बनतो.
ह्या उणिवांचा शिक्षणात
विचार केलेलाच नाही.
भारतीय शिक्षण पद्धत
सर्वांगीण नाही हे शिक्षण
तज्ज्ञ सांगत होते तोवर
शिक्षणाचा धंदा सुरु झाला.
मोठे उद्योजक, पुढार्यांनी
शाळांमधून गुंतवणूक
करून शिक्षण संकल्पनेला
धूळ चारली.
एखादी स्त्री गरोदर
राहिली तर जन्माला
येणाऱ्या जीवाच्या
admission ची तयारी
सुरु होते.
कृष्णाला जन्मण्याआधी
मारायची तयारी मामाने
केली होती.
आता मुल जन्माला
येण्याआधी त्याला रेसचा
घोडा बनवायची तयारी
सुरु होते. आता मुलाने
बोलायला सुरुवात केली
की थेट
E =MC square
म्हणायचं बाकी राहिलं
आहे.

अशी मुले सर्व formula
पटापट म्हणून दाखवतील
पण स्वतःचा formula
कधीही शोधू शकणार नाहीत.

guitar शिकतील पण
स्वतःची संगीत रचना करू
शकणार नाहीत.
लता मंगेशकर,
सचिन तेंडूलकर,
मेरी कोम ह्यांचं
अनुकरण अचूक करतील.
पण स्वतःची ओळख निर्माण करणार नाहीत.

कारण त्यांना फक्त अनुकरण
करायला शिकवलं जातं.
जगायची कला,
गीत-संगीतातील आनंद,
निसर्ग संपदेची भव्यता,
नव्या संकल्पनांची निर्मिती,
जुन्या विचारांचा आधार,
साहित्य ह्याला बाजारू
किंमत नसल्यामुळे फक्त
जे विकलं जातं तेच ज्ञान
मुलांना मिळतंय, त्यात
ते पारंगत होत आहेत.
काही जणांना campus
मध्ये दर महिना
४ लाखांपेक्षा जास्त
पगार असणारी नोकरी
मिळतेय....पण त्यात
देशाचं नाही,
भांडवलदारांच हित
साधला जातंय. पुढची
पिढी मोठी पदवी मिळवेल
पण न स्वतः जगण्याचा
आनंद लुटू शकतील,
न दुसर्याला जगण्याची
मजा मिळू देतील...

अगदी हाच धोका ओळखून
जपानमध्ये शाळेत
AC लावत नाहीत.
तिथे मुलांना घोकंपट्टी पेक्षा
practical वर भर देतात.
वृक्ष-वेली स्वतःच अन्न
स्वतः तयार करतात त्या
प्रक्रियेला काय म्हणतात?...
असे प्रश्न विद्यार्थ्यांना न
विचारता शाळेत व बाहेर
भाजी लावायला शिकवतात.
त्या रोपांची-वेलींची
जोपासना करायला
लावतात.
"निप्पोन technology " ने
केलेल्या तपासणीत म्हटलं
आहे की शाळेच्या
आवारातील वेलींमुळे
तापमान चार अंश कमी झालं आहे.
आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नातं जोडू लागली
आहेत. जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते.
तिथे लहान मुलांची बोटे
नाजूक असतात हे
लक्षात घेऊन दुसरीपर्यंत
लेखन करू देत नाहीत.
पाचवीपर्यंत practical
चालतं आणि त्यानंतर
विद्यार्थी बँक कर्मचारी
बनेल की हवाई सेविका,
प्रशासन सांभाळेल की
कुशल कामगार होईल
ह्याची सतत तपासणी होते.
दहावीनंतर फक्त त्याला
आवडणाऱ्या क्षेत्राचं
प्रशिक्षण देतात. सगळे
एकदम science मध्ये
भरत नाहीत.
अनावश्यक विषय शिकवत
नाहीत.
चीन हा cycle प्रेमी देश
४ वर्षाच्या मुलांना
cycle चालवण्याचं
शिक्षण देतो.
त्यानंतर theory कमी
आणि प्रत्यक्ष कृती
शिकवतात.

प्रत्येक विद्यार्थी उद्या देश
चालवणार ह्याचा विचार
Netherlands सारखा
देशही करतो.
एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या
विषयांचा मारा करत नाहीत.
चारी दिशांनी अनेक विषय
आणि क्लासचा मारा
सोसण्याचे काम भारतीय
विद्यार्थ्यांना करावे लागते.

शिक्षण काय असतं?
रवींद्रनाथ टागोर काय
म्हणतात पहा.
टागोरांची "शांतीनिकेतन"
शाळा झाडांखाली भरत असे.
पक्ष्यांची किलबिल ऐकू येई.
एकदा टागोर झाडाखाली
बसले होते. चार विद्यार्थी
त्यांच्या समोर पुस्तकात
डोक खुपसून बसली होती.
आणि उरलेली बरीच मुले
खेळत-बागडत होती.
कोणी झाडावर चढला होता,
कोणी फुलांचा सुगंध घेत
फिरत होता.
तेवढ्यात एक पालक
तिथे आले.
पाहतात तर काय...गुरुदेव
शांतपणे बसले होते
आणि फक्त चार मुले
पुस्तकात डोके खुपसून
बसली होती व इतर मुले
हसण्यात-नाचण्यात रमली
होती.
सुटा-बुटातील पालक
महाशय टागोरांना म्हणाले-
“या नाचणाऱ्या-बागडणार्या
मुलांच्या भवितव्याची
तुम्हाला चिंता वाटत
नाही का?”
टागोर म्हणाले-
“चिंता वाटते, पण
नाचणाऱ्या-बागडणार्या
मुलांची नाही तर
पुस्तकात तोंड खुपसून
बसलेल्या मुलांची.
ही मुले खेळण्या-
बागडण्याच्या वयात मोठ्या
माणसांसारखी वागत
आहेत. ही मुले लहान वयात
प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर
मीसुद्धा अजून झालो नाही.
खरं तर मलाही झाडावर
चढावं असं वाटतं.
पक्ष्यांशी बोलावंसं वाटतं.
भरपूर खेळावंसं वाटतं.
पण माझं शरीर आता
साथ देत नाही. “
टागोर जगण्यासाठी
शिकवत होते. आता
शिकण्यासाठी जगावे लागते.
जास्त ज्ञान, जास्त
कला घेऊन मुले धावत
असतात.

आणि पालक त्यांच्यावर
पैसे लावतात !
मग एक रेस सुरु होते
आणि जगायचं राहून जातं !!

--  *Nana Patekar.*

(बघा इतरांशी share करायला विसरू नका... )


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या