Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

या..आत्महत्याने खळबळ..जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत अंत्यविधी होणार नाही..

 आपला ई पेपर अंबाजोगाई 


बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील एका तरुणाने मराठा आरक्षण देण्याची मागणी करत, पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. शत्रुघ्न काशीद असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी शत्रुघ्न शुक्रवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला होता. तिथे काही काळ शत्रुघ्न याने आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली. तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच हजर झालेल्या पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने रात्रीच्या सुमारास टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन...

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात देखील गावागावात आंदोलन सुरु आहे. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली गावातील शत्रुघ्न काशीद या तरुणाने देखील आपल्या गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्याच्याकडून करण्यात आली. तर, पाण्याच्या टाकीवर चढल्यावर त्याने आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली. तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच, पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आपल्या मागणीवर ठाम राहिला. अखेर रात्रीच्या सुमारास त्याने टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या