आपला ई पेपर |प्रतिनिधी |परळी वैजनाथ |रेल्वे स्टेशन म्हणजे परळीतील रेल्वे प्रवाशीसाठी एक डोकेदुखी ठरत आहे. प्रवाशांना कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध नसून आहे त्यात सुद्धा चक्क छोट्या किरकोळ पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
बसायला सुद्धा जागा नसून रेल्वे प्रशासनाने याबाबत काहीतरी उपाययोजना करावी.
सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत असणाऱ्या रेल्वे प्रशासनाचे कार्य सदैव कौतुकास्पद असते.परंतु परळी रेल्वे प्रशासनाचा कारभार पाहता याला अपवाद ठरत असल्याची चर्चा सुरू आहे.यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे
प्रवाशांजवळ बॅगा किंवा वय वृद्ध प्रवासी लेकुरवाळे आदी प्रवासी यांना हा त्रास करावा लागत आहे. त्यातही रेल्वे किंवा इतर ओझे असते त्यामूळे एका निघण्याची वेळ झाली तर ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाशांची मोठी गैरसोय होते. जाण्यासाठी प्रचंड धावपळ करावी. लागते.
0 टिप्पण्या