जिंदगी के हार मोडपर...या फोटोतील संवेदना...ह्दयाला भिडतात का.. ..?
आपण प्रत्येक जण लग्नाच्या वेळी सात फेऱ्यांद्वारे आयुष्याच्या प्रत्येक सुख दुखात सोबत राहण्याचे व एकमेकांना साथ देण्याचे वचन देतो. एक यशस्वी वैवाहिक जीवनासाठी दोघांनी एक दुसऱ्याला समजून घेणे फार महत्वाचे असते.ह्यांच्याकडे कोणतीही तक्रार नाहीय...ना आयुष्याकडे,ना परमेश्वराकडे... ना कोणता बहाणा आहे...
नवरा आंधळा आहे, बायको दोन्ही पायांनी अधू आहे...तरी पण अभिमानाने जगतायत. दोघे एकमेकांचा आधार बनले आहेत, ना मनात काडीमोड घेण्याची भावना.
पती पत्नीच्या नात्यात प्रेम व विश्वास असला की ते नाते एक यशस्वी नाते मानले जाते. शरीरासाठी ज्या पद्धतीने ऑक्सिजन ची आवश्यकता असते त्याच पद्धतीने नवरा बायको च्या नात्यात प्रेम असणे आवश्यक असते.
नाही तर आजकाल लोकांकडे करोडो रुपये असून ही थोडी काही कुरबुर झाली संसारात की घटस्फोट घेतात...
0 टिप्पण्या