Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

प्रत्येक पालकाने नक्की वाचावे असे....... एक प्रेरणादायी पत्र

 एक प्रेरणादायी पत्र......

प्रत्येक पालकाने नक्की वाचावे असे.......



कृपया लक्षात ठेवा....

परीक्षेला बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना ९० आणि ९५ टक्के पेक्षा जास्त गुण घेणे शक्य नसते.एखाद्या विद्यार्थ्याला लिखाणाची आवड असेल त्याचे एखाद्या नामांकित वर्तमान पत्रामध्ये संपादक व्हायचे धेय्य असेल म्हणून त्याला गणित विषयाचा भागाकार, गुणाकार जमत नसेल. एकाला कलाकार व्हायचे असेल म्हणून कदाचित त्याला संगणक हा विषय अवघड जात असेल.


प्रिय पालक

तुमच्या पाल्यांच्या बोर्डाच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. मला माहित आहे की तुम्ही सर्वजण तुमच्या पाल्यांनी परीक्षेमध्ये चांगली कामगिरी करावी यासाठी खरोखरच उत्सुक आहात.


पण, कृपया लक्षात ठेवा, परीक्षेला बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना ९० आणि ९५ टक्के पेक्षा जास्त गुण घेणे शक्य नसते.एखाद्या विद्यार्थ्याला लिखाणाची आवड असेल त्याचे एखाद्या नामांकित वर्तमान पत्रामध्ये संपादक व्हायचे धेय्य असेल म्हणून त्याला गणित विषयाचा भागाकार, गुणाकार जमत नसेल. एकाला कलाकार व्हायचे असेल म्हणून कदाचित त्याला संगणक हा विषय अवघड जात असेल.


 एखाद्याला उद्योजक व्हायचे आहे म्हणून त्याला सामाजिक शास्त्रातील भूगोल जमत नसेल. एखाद्याला संगीत विषयात गोडी असल्यामुळे त्याला विज्ञान विषयात कमी गुण मिळत असतील... एखादा विद्यार्थी मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यमात आला असेल म्हणून त्याला इंग्रजीची भीती वाटत असेल.  एखाद्याची शरीरयष्टी चांगली आहे आणि त्याला खेळामध्ये करिअर करायचे आहे  म्हणून तो/ ती कदाचित ५० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होईल....


 जर तुमच्या पाल्याला चांगले अव्वल गुण मिळाले तर ते खूपच छान आहेत! परंतु जर तो किंवा ती तसे करू शकली नाही  तर... कृपया त्यांच्याकडून त्यांचा आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा हिरावून घेऊ नका. त्यांना सांगा हे ठीक आहे, ही फक्त दहावी बारावीची एक परीक्षा आहे आयुष्याची परीक्षा नाही! आयुष्यामध्ये अशा अनेक परीक्षांना सामोरे जाण्यासाठी त्यांना तयार करा.  त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्या परीक्षेच्या गुणांवर नाही तर त्यांच्यावर प्रेम करता, त्यांनी कितीही स्कोअर

 केला तरीही... तुम्ही निराश होणार नाहीत आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट वेळेस तुम्ही त्यांच्या सोबत आहात याची त्यांना खात्री करून द्या.


तुमच्या पाल्याचे ध्येय त्याच्या आवडी नुसार असेल तर जग जिंकण्यासाठी  एक परीक्षा किंवा कमी मार्क त्यांची स्वप्ने प्रतिभा हिरावून घेणार नाहीत... 


 एखाद्या नातेवाईकाचा किंवा आपल्या शेजारचा मुलगा/ मुलगी डॉक्टर इंजिनियर झाले म्हणून माझ्याही पाल्याने जेईई किंवा नीटच करावी असा अट्टाहास फक्त प्रतिष्ठा जपण्यासाठी धरू नका. कृपया एक लक्ष असु द्या या जगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी आपल्या कौशल्यानुसार करिअर करून यशस्वी होऊ शकतो. केवळ मेडिकल आणि इंजिनिअरींग मध्येच करिअर आहे आणि तेच जगातील एकमेव आनंदी लोक आहेत असे नाही.


धन्यवाद

आपला हितचिंतक ,

अन्वर शेख,

प्राचार्य,सिंदफणा पब्लिक स्कूल, माजलगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या