मारवाडी युवा मंच व राधा मोहन साथी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना कपडे वाटप
चला गोरगरिबांची दिवाळी गोड करुया...!
परळी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मारवाडी युवा मंच व राधा मोहन साथी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून, शहरातील गोरगरीब नागरिकांना तसेच गरजू व्यक्तींना कपडे वाटप करण्यात आले.
गेल्या बारा-तेरा वर्षांपासून हा उपक्रम राबविला जातो. परिस्थिती हालाखीची असल्यामुळे अनेकांना दिवाळी या सणा निमित्त कपडे घेणे होत नाही अशा परिस्थितीत त्यांचे दिवाळी गोड करण्यासाठी मारवाडी युवा मंच व राधा मोहन साथी प्रतिष्ठान पुढे सरसावले आणि शहरातील औद्योगिक वसाहत सभागृहात गरजूंना दररोज घालावयाचे कपडे, साड्या, लहान मुलांचे ड्रेस वाटप करण्यात आले.
यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून दिवाळी गोड झाल्याचा आनंद राधा मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी सांगितले.कार्यक्रमाचे थोडक्यात प्रस्ताविक पत्रकार लक्ष्मण वाकडे यांनी केले.
यावेळी मारवाडी युवा मंचाचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचिव जयपाल लाहोटी कोषाध्यक्ष विजय वाकेकर,ओमप्रकाश सारडा,रतन कोठारी,संजय दरक,सतीश बंग, अशोक कांकरिया,ओमप्रकाश सारडा जयप्रकाश बियाणी, राधेश्याम झंवर,प्रकाश वर्मा,सुरज बियाणी,सोमनाथ गडेकर , नगरसेवक नितीन रोडे,ज्येष्ठ नेते सोपान रोडे,आनंद तूपसमुंद्रे, गणेश रामदासी,शुभम चव्हाण आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या