परळीत वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा..| पोलीस प्रशासन बेपत्ता |अवैध वाहतुकीचा अड्डा..ने नागरिक त्रस्त
डॉ.शामाप्रसाद मुखर्जी रेल्वेउड्डाणपुलावर सततची वाहतुक कोंडी हा नित्याचाच बनलेला विषय आहे.
परळीत आज दुपारी पुन्हा एकदा उडाण पुलावर वाहतुकीचा खेळ खोळंबा झाला अवजड वाहनाच्या ट्राफिक मुळे येथे सतत टॉपिक जाम होते आहे आज दुपारी उड्डाणपुलावर तब्बल एक ते दीड तास वाहतूक जागेवरच ठप्प झाली होती.तरीही सतत याकडे पोलीस मात्र बिनदेखतपणे दुर्लक्ष का करत आहेत हेच कळत नाही.
परळीतील उड्डाणपूल आतापर्यंत अवैध धंद्याचा अड्डा तसेच अवैध वाहतुकीसाठी व अपघातासाठी नेहमीच चर्चेत असतो. या सगळ्या घटनाचे मूळ कारण पोलिसांचे याकडे असलेला दुर्लक्ष हेच मुख्य कारण आहे.
कधीकधी याच उड्डाणपूलावर वाहनाचा दंडात्मक कारवाई च्या नावाखाली टोळक्या टोळक्याने दिसणारे तत्पर पोलीस बांधव पण आज कुठं दिसत नव्हते. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास फारच अडथळे निर्माण झाले होते. दसऱ्याच्या खरेदीसाठी सहपरिवार निघालेल्या प्रवासी व नागरिकांना याचा मात्र सतत त्रास होत आहे. परळीकरांना उड्डाणपुलाच्या या त्रासातून कोण मुक्त करणार याकडे मात्र अनेक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या