नगर बीड परळी रेल्वे मार्गावर ट्रायल रन दरम्यान अपघात |एकचा जागीच मृत्यू
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा अद्याप सुरू झालेली नाही. नगर बीड परळी रेल्वे मार्गावर ट्रायल रन दरम्यान रुळावर आलेल्या गायींना वाचवताना एका शेतकऱ्याचा आणि त्याच्या एका गायीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार 24 रोजी दुपारी घडली.
नगर तालुक्यातील नारायणडोह गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातात एका गायीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील नारायणडोह येथील पांडुरंग दौलत साठे वय 75 हे नारायणडोह शिवारात नव्याने दाखल झाले होते.
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळाजवळ जनावरे चरण्यासाठी घेऊन जात असताना हा अपघात झाला. गायी रुळावर येताच टेस्टिंग ट्रेनचे इंजिन समोर आले. त्यातून त्यांच्या गायींना वाचवण्यासाठी पांडुरंग साठे पुढे आले, मात्र त्यांना गाय वाचवता आली नाही, उलट त्यांचाही जीव गेला.
नेहमीच रेल्वे प्रशासन अचानक अशा चाचण्या घेते, त्यामुळे अपघात होऊ शकतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील गावांतील नागरिकांना पूर्वसूचना देणे आवश्यक आहे.’ अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
0 टिप्पण्या