दिवसा ढवळ्या ऊसतोड कामगाराचे अपहरण |गुन्हा दाखल
एका उसतोड मुजराने सहा महिन्याचा काम करूनही त्याची एक लाख रुपये घेतलेली उचल फिटली नाही म्हणून मुकादमाने ऊसतोड कामगाराचे अपहरण केले आहे.
बीड जिल्ह्यातील एका ऊस मजुराचे 50 हजार रुपयासाठी अपहरण पोलिस सुञाकडून दिलेली माहिती अशी,करण मारोती कापसे वय 25, रा.उमापूर,रा. गेवराई असे अपहरण केलेल्या मजुराचे नाव आहे.
करणने बंगाली पिंपळा, पी.गेवराई गेल्या वर्षी येथून 1लाख 30 हजार रुपये उचल घेतली होती. 4महिने काम करून 80 हजार रुपये दिले. मात्र, सासर्याचे निधन झाल्याने ते नोव्हेंबरमध्ये गावी आले.
त्यामुळे अण्णा यांनी उर्वरित 50 हजार रुपयांसाठी वाद सुरू केला. मात्र करणचे वडील मारोती शामराव कापसे यांनी पैसे मिळताच देऊ,असे सांगितले.
4 ऑगस्ट रोजी करणची मालवाहू रिक्षा तळेंवाडी फाट्यावर थांबली होती. यावेळी अण्णा जीपमधून तेथे आला आणि अन्य दोघांच्या मदतीने करणला जबरदस्तीने आत घेऊन त्याला दरम्यान, याप्रकरणी मारोती कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकादम अण्णा हापटे व दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध चकळांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या