आज अत्यंसंस्कार |अॅड.गिरीश राजूरकर यांचे हृदयविकाराचा तीव्र झटकाने निधन
परळी शहरातील अॅड.गिरीश बालासाहेब राजूरकर यांचे आज दि 17 रोजी पुणे येथे हृदयविकाराने अकाली निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 44 वर्षे वयाचे होते. ॲड.राजूरकर यांच्या आकस्मिक निधनाने मित्र परिवारामध्ये सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
आज अंत्यसंस्कार...
परळी येथील अक्षरधाम मुक्तीधाम मध्ये आज दि.18 रोजी सकाळी 9;30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा आंबिवेस येतील त्यांचे राहते घर राजूरकर निवास येथून निघणार आहे
पुणे येथे कार्यरत युवा वकील अॅड. गिरीश बालासाहेब राजूरकर यांनाचे काल दि17 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटकाने त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी,तीनभाऊ,भावजई असा मोठा परिवार आहे.अॅड. गिरीश राजूरकर हे परळी शहरात सर्व परिचित व्यक्तिमत्व होते. विविध धार्मिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यात ते नेहमी सक्रिय होते.
आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुणे येथे वकील म्हणून कार्यरत होते.राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात त्यांचा दांडगा संपर्क होता.त्यांचा मोठा मित्रपरिवार व नेहमी प्रत्येक कार्यात अग्रेसर राहणारा तरुण म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. परळी येथील क्षेत्र उपाध्याय स्वर्गीय बालासाहेब राजूरकर यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होते.
त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने राजूरकर परिवारावर कोसळलेल्या या दुःखात आपलापेपर न्युज परिवार सहभागी आहे
0 टिप्पण्या