हे सगळे|आरक्षणच सर्वोच्च न्यायालयाने केले रद्द |नव्या शिंदे-फडणवीस
सरकारपुढे आरक्षणाचा प्रश्न...
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात
आरक्षणाचा संघर्ष कधी संपणार? गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात मराठा आरक्षणाची लढाई सुरू आहे. फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिले गेले, ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकून राहिले पण त्याची टक्केवारी काहीशी कमी झाली. सुरुवातीला 16% आरक्षण उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर ते 13% करण्यात आले.
मात्र, सर्वोच्च न्यायालयात गेल्याने मराठा आरक्षण टिकू शकले. नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने थेट आरक्षण रद्द केले. त्यामुळे आरक्षणासाठी मराठा समाजाचा संघर्ष अजूनही संपलेला नाही. मागील काही वर्षभरात आरक्षणासाठी अनेक आंदोलने झाली. तसेच, कोर्टातील लढाई सुरूच आहे.
आरक्षणाच्या आशा अजूनही धुसर आहेत. त्यामुळे भविष्यातील संघर्ष कायम आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले EWS आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला अपयश आल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून EWS आरक्षण देण्यात आले.
पण आता त्यलाही मोठा ब्रेक मिळाला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणीत आता खूप वाढ झाली आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज पुन्हा आक्रमक होऊन रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. नव्या शिंदे-फडणवीस सरकारपुढे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
*Live दर्शन |थेट प्रभू वैद्यनाथाच्या गाभाऱ्यात....
0 टिप्पण्या