मोठा शिक्षक भरती घोटाळा उघडकीस |तब्बल 15 कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात
BREAKING NEWS शिवसेनेचा |धनुष्यबाण |अन् रिमोट कंट्रोल कोणाच्या हाती जाणार
महाराष्ट्र TET घोटाळ्यानंतर आता पश्चिम बंगालमध्येही शिक्षण क्षेत्रात मोठा शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आला आहे.
याघोटाळ्याच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने मंत्री पार्थ चॅटर्जी व काही मंत्री, सरकारी अधिकारी, दलाल आणि खाजगी व्यक्तींच्या घरांवर छापे टाकले. अर्पिता मुखर्जीच्या निवासस्थानावरही ईडीने छापे टाकले आहेत. अर्पिता मुखर्जी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते आहे.
अशी दलाली करणारे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात अनेक बडे अधिकारी व नेते सध्या कार्यरत आहेत त्यांच्यावर महाराष्ट्र सरकार चौकशी कधी लावणार याकडेही शिक्षक भरतीसाठी तब्बल पाच वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांनी मागणी केली आहे.पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष कल्याणमय गांगुली, पश्चिम बंगालचे माजी केंद्रीय शाळा सेवा आयोगाचे अध्यक्ष सौमित्र सरकार, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव आलोक कुमार सरकार, शिक्षकांच्या नोकऱ्या विकणारे एजंट चंदन मंडल उर्फ रंजन आदींकडून 20 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. PM किसान 12 व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत प्रतीक्षा संपणार... या दिवशी मिळणार
छापेमारीत अर्पिता मुखर्जीच्या घरातून 20 कोटींहून अधिक रक्कम जप्त केल्याचा दावा ईडीने केला आहे. ही रक्कम स्टाफ सिलेक्शन कमिशन घोटाळ्याशी संबंधित असल्याचा ईडीला दाट संशय आहे. याची सखोल चौकशी होते आहे.घोटाळा मोठा असून रक्कम मोजण्या साठी पथकाने चक्क नोट मोजण्याची मशिन आणली होती. याशिवाय त्यांच्याकडून 2 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. अर्पिता मुखर्जीने इतके फोन का वापरले? या संदर्भातही चौकशी सुरू आहे. गुड न्यूज S T कर्मचाऱ्यांनाचा पगार इतर बँकेतून उचलता येणार त्यासाठी हे करावे लागणार
सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवले होते. सूत्रांनी दिलेल्या अधिकमाहितीनुसार या प्रकरणात अनेक मोठे नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सामोरे जावे लागणार....: दोन मित्र काय निर्णय घेतात | याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष |
0 टिप्पण्या