Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला लोकांनी दिली पसंती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची कारणे काय?




पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला लोकांनी पसंती देत एनडीएला भरभरुन मतदान केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पसंती देण्यामागे अनेक कारणे होती. त्यातील काहींवर नजर टाकुयात... 

1) सगळ्या जागांवर मोदी : देशभरात एनडीएकडून सगळ्या जागांवर मोदींसाठीच मतदान मागण्यात आले. त्यामुळे भाजपला या प्रचाराचा फायदा झाला.

2) देशभक्ती मुद्दा : विरोधी पक्षाला न जुमानता भारतीय जनता पार्टीने प्रचाराच्या शेवटपर्यंत देशभक्ती हा मुद्दा आक्रमकपणे निवडणुकीच्या अजेंड्यावर ठेवला.

3) राष्ट्रीय सुरक्षा : दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा आणि त्यासाठी मोदी सरकारने आक्रमक पाऊले उचलली. हा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला.

4) भारताला पाठिंबा : भारताने जगाच्या प्रत्येक देशापर्यंत दहशतवाद हा मुद्दा प्रभावीपणे पोहचवला. त्यामुळे जागतिक स्तरावर दहशतवादाच्या मुद्द्यावरुन अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला.

5) हिंदूत्त्व मुद्दा : वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदीर, तसेच केदारनाथ-बद्रीनाथ येथील दौरे, गंगाघाटावर पूजापाठ, आरती यासारख्या कार्यक्रमातून हा मुद्दा दिसून आला.

6) स्वच्छता अभियान : स्वच्छता अभियान, परिसर स्वच्छ ठेवणे यासारख्या योजना नरेंद्र मोदींनी प्रतिष्ठेचा विषय केला. यामुळे या अभियानात अनेक महत्त्वाचे नेते, अभिनेते, सामान्य माणूसही जोडला गेला.

7) आयुष्यमान भारत योजना: आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 50 करोडपेक्षा अधिक लोक जोडले गेले आहेत. त्यांना पाच लाखांपर्यंत विमा मिळेल. ही योजना यशस्वी झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केला.

8) उज्ज्वला योजना : मोदी सरकारची ही योजना ग्रामीण महिलांसाठी लाभदायक ठरल्याचा चांगला प्रचार झाला. 'मन की बात'मधून या योजनेच्या लाभार्थ्यांसोबतही मोदींनी चर्चा केली.

9) महागाई व भ्रष्टाचार : भाजपच्या कार्यकाळात चलनवाढ नियंत्रणाखाली असल्याचा दावा करण्यात आला. त्याचबरोबर मागील सरकारमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारात वापरला गेला.

10) विरोधकांची भ्रष्ट आघाडी : एकीकडे विरोधकांची भ्रष्ट आघाडी तर दुसरीकडे एकटे नरेंद्र मोदी अशी ही लढाई असल्याचा प्रचार मोदींनी केला.

11) सुशासन : नरेंद्र मोदी यांच्या काळात प्रशासकीय विभाग शिस्तबद्धपद्धतीने काम करायला लागली. भ्रष्टाचार कमी झाला. यासारखे मुद्दे भाजपाकडून प्रचारात वापरण्यात आले. 

12) आक्रमक प्रचार : लोकसभा निवडणुक जाहीर झाल्यापासून देशभरात भाजपकडून जवळपास 1000हून जास्त रोड शो, सभा घेण्यात आल्या. तसेच प्रत्येक प्रचारात आक्रमक प्रचार करण्यात आला.