Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सर्वपक्षीय नेत्यांनी जागवल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणी




परळी वैजनाथ // येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदीर येथे दि.18 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या श्रध्दांजली सभेत सर्वपक्षीय नेत्यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे मराठवाड्याशी आणि विशेषत: परळीशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते.

स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासाठी स्व.अटलजींनी परळीत दोन सभा घेतल्या होत्या. या सभेच्या अनुषंगाने परळीत आलेल्या अटलजींनी परळीकरांना आपलेसे करून घेतले होते. स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. एक सह्रदयी नेता, दूरदृष्टीचा पंतप्रधान, अद्वितीय लेख आणि कवी असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. देशाच्या विकासासाठी त्यांनी सर्वपक्षीयांना सोबत घेवून काम केले. स्पष्टवक्तेपणा असला तरी राजकारणात त्यांनी अजातशत्रुत्वाची भावना निर्माण केली. त्यांच्या जाण्याने राजकारण व समाजकारणातील एका महान सुर्याचा अस्त झाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.

श्रध्दांजली सभेच्या सुरूवातीस सर्वांनी स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांना श्रध्दांजली वाहीली. तद्नंतर सर्वपक्षीयांनी आपल्या मनोगतातून त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. आजच्या श्रध्दांजली सभेत डॉ.गुरूपक्ष शिवाचार्य महाराज, मान्मथधाम आश्रम मांजरसुंभा, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे सर, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाबुराव मुंडे, नगराध्यक्षा सौ.सरोजीनीताई हालगे, नगरसेवक सोमनाथअप्पा हालगे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष फुलचंद कराड, डॉ.हरिश्चंद्र वंगे, अशोक सामत, दत्ताप्पा ईटके गुरूजी, विकासराव डुबे, भाजपाचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, माकपाचे कॉ.पी.एस.घाडगे,  रिपाईचे जेष्ठ नेते धम्मानंद मुंडे, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष तुळशिराम पवार, रा.काँ.शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, बाळासाहेब देशमुख, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड, परळी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय काळे, जेष्ठ साहीत्यीक प्रा.मधु जामकर, शिवसेनेचे वैजनाथ सोळंके, तानाजी देशमुख, महादेवअप्पा तिळकरी, जेष्ठ नेते विठ्ठलअप्पा चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, अ‍ॅड.राजेश्वर देशमुख, जेष्ठ नेते शेख अब्दुल करीम, क्रिडा शिक्षक सुभाष नानेकर, सतिश जगताप, सौ.सरला उपाध्याय, माधव ताटे, गौतम आगळे, मनसेचे श्रीकांत पाथरकर  आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. तर यावेळी  श्रीहरी मुंडे, भिमराव मुंडे, विनोद सामत, जीवराज ढाकणे, वैजनाथराव जगतकर, नगरसेवक चंदुलाल बियाणी, नगरसेविका उमाताई समशेट्टी, अभयकुमार ठक्कर, प्रकाश जोशी, अतुल दुबे, उमेश खाडे, किरण धोंड, राजेंद्र ओझा, महादेव ईटके, अनिश अग्रवाल सचिन गित्ते मोहन जोशी व्यंकटेश शिंदे, विजय खोसे, योगेश पांडकर, रवी कांदे, अ‍ॅड.अरूण पाठक, गणेश होळंबे, नरेश पिंपळे, अश्विन मोगरकर, रमेश गायकवाड, कमलाकर हारेगावकर धनराज कुरील आदींसह सर्वपक्षीय आणि संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अर्चना चव्हाण आणि विरश्री आर्या यांनी केले.