Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड- धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात सहा जणांचा जागीच मृत्यू

  आपला ई पेपर /online/प्रतिनिधी 


बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला. बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला आहे. सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे.घटनेनंतर मृतदेह रस्त्यावर पडले होते. पोलीस फरार ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर हा भीषण अपघात झाला. सोमवारी रात्री ८.३० वाजता, गेवराई येथील दीपक अतकरे यांची एसयूव्ही कार राष्ट्रीय महामार्ग ५२ वर १०० किमी अंतरावर असलेल्या गढी गावाजवळ दुभाजकावरून चढली. त्यामुळे गाडीतील सर्वजण खाली उतरले आणि त्यांनी एसयूव्ही बाजूला करण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र गाडी बाजूला काढण्यात व्यस्त असताना रात्री ११.३० च्या सुमारास एका ट्रकने त्यांना चिरडले. त्यापैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जखमी झाला.

ही धडक इतकी भीषण होती सहा जणांचे मृतदेह रस्त्यावर फेकले गेले तर गाडीचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. तर ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. बाळू अतकरे, भागवत परळकर, सचिन नन्नवरे, मनोज कारंडे, कृष्णा जाधव आणि दीपक सुरय्या अशी मृतांची नावे असून ते सर्व गेवराई येथील रहिवासी आहेत. सहा जणांच्या मृत्यूने मात्र संपूर्ण गेवराईवर शोककळा पसरली आहे.