शेतकरी संवाद यात्रेला परळी मतदारसंघात शेतकऱ्यांच्या उदंड प्रतिसादा नंतर यशस्वी सांगता
आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने शेतकरी संवाद यात्रा काढण्यात आली. राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकत्व असलेल्या नेतृत्वा कडुन मतदार संघात कुठेही ना शेतकरी, ना युवक, ना सर्वसामान्य जनतेच्या सर्वाणगिण विकासात्मक पातळीवर विकास दिसून आला नाही.मला पाहा आणि फुले व्हा असणाऱ्या मंत्र्याला यावेळी परळी मतदार संघातील जनता पराभूत केल्या शिवाय राहणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सुनील भैया गुट्टे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जेष्ठ नेत्या सौ.सुदामतीताई गुट्टे व शेतकरी नेते कालिदास दादा आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली,युवानेते सुनील भैया गुट्टे यांच्या नेतृत्वात परळी मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचा सुसंवाद करण्यासाठी शेतकरी संवाद यात्रेचे मतदारसंघात दोन टप्प्यात आयोजन करण्यात आले होते.या शेतकरी संवाद यात्रे दरम्यान पहिल्या टप्प्यामध्ये 9 दिवस 88 गावं 423 किलोमीटर प्रवास तर दुसरा टप्पा 6 दिवस 68 गाव 370 किलोमीटर चा प्रवास पूर्ण करून या संवाद यात्रेने हजारो नागरिकांशी थेट संवाद साधला गेला.शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा शेतकऱ्यांना अजूनही भेटला नाही, अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान भेटले नाही ,राज्य सरकारने व कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कुठलाही आधार दिला नाही 25 टक्के अग्रीमची घोषणा करून आज तागायत दोन महिने उलटुन गेले यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा रोष दिसून येतो आहे.मतदारसंघात बहुतांश रस्त्याची खूप मोठी दुर्वास्था दिसून येत आली.कुठल्याही गावाला पांदण रस्ते, शेत रस्ते झालेले नाहीत दळणवळण आणि विकासाच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी करणं गरजेचं होत अपेक्षित होत असं कुठलंही काम परळी मतदारसंघातील जनतेला दिसत नाही कृषिमंत्र्यांनी पाच वर्षांमध्ये किमान पाच गावांना पाच वेळा सुद्धा भेटी दिलेल्या नाहीत. शासनाच्या अनेक योजना ह्या सर्वसामान्य लोकांना मिळालेले नाहीत. ज्या लोकांचे मजबूत घर आहेत अश्याच लोकांना घरकुलचा लाभ देण्यात आला आहे.सर्वसामान्य गरजवंत लोकांना ही योजना नाही प्रत्येक गावामध्ये एक ते दोन पुढारी नेमलेले आहेत त्या गावांमध्ये त्या योजनेचा लाभ कोणाला द्यायचा तेथे पुढारी ठरवतात यामुळे त्यांच्या फक्त कार्यकर्ते आणि गाव पुढारी यांनाच योजना व ज्या सुखसुविधाचा लाभ मिळतो बाकी सर्व सामान्य लोकांना कुठलीही योजना परळी मतदारसंघात मागच्या पाच वर्षात मिळालेल्या नाहीत. कृषिमंत्र्यांनी फाईव्हस्टार एमआयडीसीच्या फक्त अनेक वेळा घोषण व बातम्या लावल्या चर्चा केल्या पण प्रत्यक्षात कुठलंही काम केलेले दिसून येत नाही. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी मागच्या सहा-सात वर्षापासून हा कारखाना बंद झाल्याने निर्माण झाल्याआहेत.पाच वर्षात दोन सरकार मध्ये दोनदा मंत्रीपद मिळाल्यानंतर तरी प्रगती होणे अपेक्षित असताना दोन चे चार कारखाने होणे गरजेचे असताना आहे ते कारखाने बंद पाडला गेला आहे.शेतकरी,ऊस वाहतूकदार व कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे करोडो रुपये थकीत आहेत हे संपूर्ण नागरिक यावर नाखुष दिसून येतात यावर कोणीही बोलायला तयार नाही.सगळा युवक बेरोजगारीने त्रस्त झाला आहे. जि.पच्या शाळा डिजिटल करणार अशी घोषणा सरकार करते परंतु मतदारसंघात एकही शाळा डिजिटल दिसली नाही.व्यापा-यांच्या पुर्ण एजन्सी काढून घेत जात असल्याने व्यापारी त्रस्त आहे.दहशत,गुंडगिरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन जो कोणी आवाज उठवेल त्याच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण भयानक असुन परळी मतदारसंघातील मागच्या पाच वर्षांमध्ये हजारो लोकांचे पुणे मुंबई या ठिकाणी कामासाठी स्थलांतरित झाले आहेत यालाही पालकमंत्री च जवाबदार आहेत.बारामतीच्या धरतीवरून विकास करणार मतदारसंघातील प्रत्येकाचे उत्पन्न दुप्पट करणार,उद्योग निर्माण करणार अशा अनेक वेळा वलघणा पालकमंत्र्यांनी वेळोवळी भाषणात केल्या यासाठी करोडोचा निधी मतदारसंघात आला परंतु केवळ कागदावर दिसतो पण प्रत्यक्षात तो विकास कुठेही दिसत नाही.कागदावर च कामे दाखवून बिले उचलली जात आहेत.यामुळे कृषीमंत्र्याच्या मोठ्या मोठ्या भाषणाला आणि आश्वासनाला परळी मतदार संघातील जनता पूर्णपणे वैतागली असुन ना शेतकरी, ना युवक, ना सर्वसामान्य जनतेच्या सर्वाणगिण विकासात्मक पातळीवर कृषिमंत्री धनंजय मुंडे हे फेल ठरल्याचे दिसून आले असलेल्याचे हजारो नागरिकांच्या संवादातून दिसून आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवानेते सुनील भैया गुट्टे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
शेतकरी संवाद यात्रेच्या मार्गदर्शिका सौ सुदामतीताई गुट्टे व शेतकरी नेते कालिदास दादा आपेट यांच्या नेतृत्वाखाली यात्रा संपन्न झाली असुन युवानेते सुनील भैया गुट्टे,तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, विधानसभा अध्यक्ष किरण काका पवार, शेतकरी संघटना प्रदेश कार्याध्यक्ष कालिदास आपेट, तालुका सचिव ईश्वर सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष रमेश ढाकणे, उपाध्यक्ष महारुद्र कदम, शहराध्यक्ष ॲड जीवनराव देशमुख, युवक शहराध्यक्ष सय्यद फिरोज, दत्ताभाऊ शिंदे, जगन्नाथ आप्पा काकडे, कैलास लाकडे, मारुती भद्रे, जगमित्र पोळ, व्यंकटेश निर्मळ, दिनेश तपसे, धनंजय जाधव, मुक्तार भाई, शिवाजीराव लोमटे, बब्रुवान आघाव, आदिनाथ कदम, मदनराव वानखेडे, रुस्तुम माने, विशाल माने, ऋषिकेश शिंदे, सुदर्शन शिंदे, बाळासाहेब रुपनर, सर्जेराव गडदे, नागनाथ शिंदे, विजयराव भोसले, हनुमंतराव सोळंके, श्रीकृष्ण जाधव, अंगदराव वाकडे, राजकमल देशमुख, अमोल बावणे, उद्धवराव आघाव, सोमनाथराव भोसले, वृक्षराज काळे, राजेभाऊ काळे, बंडू काळे, गोपाळराव शिंगाडे, छत्रगुण नाना लांडगे, बळीराम गुट्टे, बाबासाहेब गव्हाणे, नंदू दोडके, नितीन हारे, प्रणित अटुळे यांसह शेतकरी संवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले.
परळी शहरात महिलांसाठी स्वच्छ शौचालय दाखवा आणि पाच हजार बक्षीस मिळवा-सौ.सुदामतीताई गुट्टे
परळी शहर हे प्रभु वैद्यनाथाची नगरी म्हणून ओळखली जाते राज्य परराज्यातील मोठ्या प्रमाणात महिला भाविक भक्त येत असतात शिवाय परळी तालुक्यातील महिला, नागरिक बाजार करण्यासाठी परळी शहरात येतात तेव्हा त्यांना कुठे शौचालय दिसून येत नाहीत असले तरी ते प्रचंड खाण, दुर्गंधी असलेले शौचालय आहेत या नैसर्गिक विधी साठी महिलांना प्रचंड मानसिक त्रास होतो आहे यामुळेच मी परळी शहरात महिलांसाठी स्वच्छ शौचालय दाखवा आणि पाच हजार बक्षीस मिळवा अशी घोषणा केली आहे.
Social Plugin