आपला ई पेपर/ लातूर/ प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीत विवाह संस्काराला खूप महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत जे सोळा संस्कार सांगितले आहेत, त्यापैकी पंधरावा संस्कार म्हणजे 'विवाह'. दोन कुटुंबांना रेशीमगाठीने सर्व आप्तेष्टांचे मनोमिलन घडवणारा संस्कार म्हणजे विवाह. परळी येथील ढाकणे परिवार म्हणजे एक नामांकित परिवार आहे. सर्वांच्या सुखा-दु:खामध्ये सहभागी होणारा परिवार आहे. वैद्यकीय आणि न्यायालयीन प्रक्रियेत सर्वांना वेळोवेळी मदत करणारा परिवार आणि ह्या परिवारातील विवाह सोहळा लातूर येथे अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
परळी वैजनाथ येथील स्मृतीशेष डॉ. श्यामराव ढाकणे यांची नात व ॲड.आशिष ढाकणे यांची पुतणी डॉ.ऐश्वर्या ढाकणे आणि इंजि.सूरज तेरकर यांचा शुभविवाह लातूर येथील ओम हामने पॅराडाईज वेडिंग हॉल मध्ये दि. ६ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यात वधू वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी सर्वच क्षेत्रातील नामवंत मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री. संजय बनसोडे, आ. विक्रम काळे , माजी आ शिवाजीराव पाटील कव्हेकर, निलेश देशमुख , केदार सारडा, मारोती कदम, संतोष जोगदंड ,डॉ नामदेव आघाव, भगवान साकसमुद्रे, गुलाम मुजीब उर्फ बबलू, संतोष नायर ,भास्कर सोनवणे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, न्यायालय,उद्योग आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या