Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Last Holiday.... रहस्यमय कथा... *"I have wasted too much of time on assumptions...

Last Holiday.... रहस्यमय कथा... 


*"I have wasted too much of time on assumptions.....now I have time only for reality."*

*'आयुष्याची शेवटची सुट्टी' (Last Holiday) हा खरच एक डोळ्यात अंजन घालणारा इंग्रजी सिनेमा आहे....*

*त्यातली नायिका ही सर्वार्थाने सर्वसामान्य असणारी तरूणी. त्यामुळे अर्थातच आयुष्यही सर्वसाधारणच. मात्र एक दिवस तिला अचानक, असाध्य रोग असल्याचं निदान होतं, मग ती ठरवते की आपण नोकरी सोडून अजून पर्यंत जी 'सुट्टी घेणं' परवडत  नव्हतं, त्या 'मोठ्ठ्या सुट्टी'वर जायचं आणि शेवटच्या पै पर्यंत सगळे पैसे उधळून टाकायचे*


*ती उंची पोषाख खरेदी करते आणि एका पंचतारांकित हाॅटेल मध्ये आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत, उच्चभ्रू वर्तुळात वावरते*

*तिथे तिच्या नशिबाचे फासे पालटतात. जुगारात शंभर हजार डाॅलर्स जिंकते. आता बतावणी करायची गरज नाही. लक्ष्मी खरंच प्रसन्न झालेली असते. तिला आनंद तर होतो...पण ती देवाला विचारते. "why now ?"आयुष्य संपतानाच का एवढा मेहेरबान झालास?"*


*पण आता तिला कशाचच सोयर सुतक नसतं. तसंच तिला आता आणखी काही' गमावण्याचीही भिती नसते. म्हणून ती उरलेलं आयुष्य खरेपणाने जगायचं ठरवते. समाजात वावरताना लागणारा 'दांभिक सभ्यतेचा' बुरखा फाडून ती स्वतःशी आणि इतरांशी निव्वळ प्रामाणिक रहाते, वागतेे, बोलते.आणि तिला जाणवतं*

*आतापर्यंत, आयुष्य गृहीत धरताना,l आपण आयुष्य खऱ्या अर्थाने जगलोच नाही. केवळ 'भविष्य' आणि 'लोकं काय म्हणतील'याची चिंता करण्यात हे सुंदर आयुष्य फुकट घालवलं"*

*"I have wasted too much of time on assumptions.....now I have time only for reality."*


*ती राहिलेलं दोन आठवड्यांच आयुष्य सच्चेपणाने जगायला सुरूवात करते आणि अचानक तिला कळतं की तिचे Reports चुकीचे आहेत. तिला कसलाही आजार नाही व ती एवढ्यात मरणार नाही. तिच्या आनंदाला पारावार रहात नाही. पण या Last Holiday नं शिकवलेला धडा, ती कधीच विसरत नाही. तिला तिची नोकरी आणि प्रियकर दोन्ही परत मिळतात !*


*फिल्मी भाग सोडला तर नायिकेच्या या आयुष्याचा प्रवास खरंच विचार करायला लावणारा होता....*

*आपणही आजचा/आत्ताचा क्षण कधी भरभरून जगतंच नाही. मनात कायम उद्याची चिंता, काही तरी अशाश्वत मिळवण्या साठी... कायम हातचं सोडून पळत्यापाठी, जीवाच्या आकांताने पळत रहातो. इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या शर्यतीत सहभागी होतो. सगळा आनंद/सगळी मजा, एखाद्या 'सुट्टीत' उपभोगण्यासाठी, शिलकीत टाकत जातो आणि हे सगळं व्यर्थ आहे... जे खरचं हवं होतं... आनंद/ समाधान... हे या कशात नव्हतंच... हेे कळायच्या आतच... 'शेवटची सुट्टी लागते'.* 

*शिलकीतली 'पुंजी' तशीच राहून जाते... न वापरलेली... कोरीच्या कोरी... पण आता निरूपयोगी....*


- *तात्पर्य* 

*आपण सर्वजण नेहमी वयाच्या पंचावन्न/साठ पर्यंत काम करत, पैसे कमवत व वेगवेगळ्या जबाबदाऱ्या संभाळत धावत राहतो, मनात विचार असतात की आता तरुण आहोत तोपर्यंत काम करु या. नंतर रिटायर झाल्यावर आपल्या शेवटच्या सुट्टीत आपापले छंद, आवडी प्रमाणे वागु/जगु या पण तो पर्यंत आपला स्टॅमिना कमी झालेला असतो बऱ्याच जणांना वेगवेगळ्या व्याधी जडलेल्या असतात. वयोमानानुसार आपल्यावर बरीच बंधन आलेली असतात व शेवटच्या सुट्टीत करण्याचे बरेच मनसुबे हे प्रत्यक्षात येतच नाहीत वा मनातच राहून जातात....*

*या 'शेवटच्या सुट्टी' पर्यंत वाट न पाहता प्रत्येक क्षण, त्याच वेळी, त्याच क्षणात, चिंता व भयमुक्त जगून घेतला तर?*

*तर प्रत्येक क्षण त्या 'सुट्टी' इतकाच आनंद देईल व सर्वांचे जीवन खरच सुंदर व आंनदी होईल...!!!*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या