आपला ई पेपर |परळी प्रतिनीधी
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जडणघडणीत कृष्णाजी अर्जून केळुसकर गुरुजी यांचे अतिशय महत्वाचे योगदान होते. सयाजीराव गायकवाड यांच्याकडून शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या यांनी मिळवून दिल्या. असे प्रतिपादन फुले -आंबडकरी अभ्यासक अरविंद खैरनार यांनी केले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन परळी येथे स्टुडंट्स फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी व फुले-आंबेडकरी अभ्यास समुह यांच्या माध्यमातून दि ३ सप्टेंबर रोजी आयोजित सत्यशोधक कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजींच्या जयंतीनिमित्त ते बोलत होते.
यावेळी विचार मंचावर अनेक मान्यवरसह आदिंची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत मस्के, सूत्रसंचालन भगवान साकसमुद्रे यांनी तर आभार लक्ष्मण वैराळ यांनी मानले
0 टिप्पण्या