महाराष्ट्रावरील सर्व नैसर्गिक संकटे दूर व्हावीत,अशी प्रार्थना धनंजय मुंडे यांनी केली
माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या परळी येथील निवासस्थानी आज रोजी श्री गणरायाचे आगमन झाले यावेळी मुंडेंनी सहपरिवार विधिवत पूजन करून श्री गणेशाची स्थापना केली.
कोविड नंतर प्रथमच मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून,गणरायाच्या आगमनाने शेतकरी,कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांना सुख समृद्धी व शांती लाभो तेच महाराष्ट्रावरील सर्व नैसर्गिक संकटे दूर व्हावीत,अशी प्रार्थना धनंजय मुंडे यांनी केली.
0 टिप्पण्या