चिरीमिरीसाठी गोरगरिबांचा जिवावर उठलेल्या यावाहतूक पोलिसांवर कारवाई कोण करणार..
काल नुकताच एका अज्ञात व्यक्तीचा या बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तरीसुद्धा आजही या बेशिस्त वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष का असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
चार दोन रुपयाच्या चिरीमिरीवर गोरगरिबांचा जिवावर उठलेल्या या वाहतूक पोलिसांवर कारवाई कोण करणार असाही सवाल नागरिकांनी केला आहे.
परळी शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते उड्डाणपूलावर रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे वाहने ट्रक ऑटो उभे करून अपघाताला निमंत्रण देणाऱ्या वाहन चालकावर कारवाई कोण करणार.. परळी पोलिस ही बेशिस्त वाहतूक कधी सुरळीत करणार....
सध्या परळी शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे.वाहन चालक नियमाचे उल्लंघन करून शहरातील मौलाना अब्दुल कलाम चौक, शिवाजी चौक, बस स्टँड जुन्या कोर्ट समोरील हॉटेल च्या समोर असलेले वाहने ऑटो रिक्षा, ट्रक समोर रस्त्याच्या दोन्ही बाजूने बेशिस्तपणे वाहने उभी केली जात आहेत. यामुळे दुकानासमोरील वाहने पार्क करताना व्यवस्थित न केल्यामुळे व्यापाऱ्यांनीही त्रास होत आहे.
परळी पोलिसांनी ही बेशिस्त वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी आज रोजी सामाजिक कार्यकर्ते नी एका निवेदनाद्वारे केली आहे.
1 टिप्पण्या