# BIGNEWS गुड न्यूज | 'या' वस्तूवरील | पाच टक्के |जीएसटीचा निर्णय मागे |
खुल्या धान्यावरील ५ टक्के जीएसटी सरकारने मागे घेतला
नुकताच गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला तो केंद्र सरकारने दि 18 जुलैपासून पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला होता. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाने याविरोधात आवाज उठवला आणि आता केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. वाढती महागाई आणि जनआक्रोश पाहता जीएसटी मागे घेणे हे उत्तर आहे
SBI | HDFC | ICICI | बँकेचे ग्राहक असाल तर | ही बातमी तुमच्यासाठी..|
त्यामुळे संसदेच्या अधिवेशनात विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते. म्हणून केंद्र सरकारने माघार घेतली. केंद्र सरकारने खुल्या धान्यावरही पाच टक्के जीएसटी लावला होता. आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा जीएसटी मागे घेत असल्याचे ट्विट केले आहे.
त्यानुसार केंद्र सरकारने डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, मैदा, रवा, बेसन, मूधी, दही आणि लस्सीवर पाच टक्के जीएसटी आकारला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. 25 किलोग्राम वजनाच्या प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्य पदार्थांवर 5% GST. 18 जुलैपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार होती. यामध्ये अनेक वस्तूंवर जीएसटीही वाढवण्यात आला होता. त्यामुळे अनेक वस्तू आणि खाद्यपदार्थ महाग झाले होते.
महागाईच्या काळात केंद्राने जीएसटी लागू केल्यावर जनता नाराज होऊ लागली त्यामुळं खुल्या धान्यावरील जीएसटी मागे घेऊन केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की खाद्य पदार्थांच्या मोठ्या प्रमाणात विक्रीवर जीएसटी आकारला जाणार नाही, म्हणजे पॅकेजिंगशिवाय आणि लेबलशिवाय. परंतु त्याच पदार्थावर लेबल असल्यास 5% जीएसटी विक्रीच्या बाबतीत विक्रीवर आकारला जाईल. या वस्तूंवर जीएसटी न लावण्याचा निर्णय हा कोणा एका व्यक्तीचा निर्णय नसून तो जीएसटी परिषदेचा निर्णय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या