सत्ता संघर्ष पेटला शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह
अन् सेनेचे रिमोट कंट्रोल ...
अन् बंडखोर नेत्यांना पक्षांतराशिवाय पर्याय नाही.
BREAKING NEWS BEED |या गावात बिबट्याचा वावर | सतर्क राहा | सुरक्षित रहा
सत्ता संघर्ष नंतर आता वेळ आली आहे. ती निवडणूक चिन्हासाठी लढा देण्याची एकनाथ शिंदेने शिवसेना बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले. आता ते शिवसेनेचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना शह देत अखेर शिवसेनेचा धनुष्यबाण आपले हाती घेणार अशी चर्चा माध्यमात आहे परंतु माननीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची बांधणी व पक्षचिन्ह अशा पद्धतीने मातोश्रीकडे ठेवले आहे. की ते भविष्यातही कुणाकडे जाऊ शकत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेच्या धरतीवर शिवसेना आणि शिवसेनेचा धनुष्यबाण हा मातोश्रीकडेच राहणार हे स्पष्ट आहे.
त्यांनी बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आले. त्यात त्यांनी आपल्या संघटनेला शिवसेना म्हणून मान्यता देण्याची मागणी केली असली तरी त्यांना शिवसेनेचा एक वेगळा गट म्हणून मान्यता मिळेल परंतु शिवसेनेचे चिन्ह आणि शिवसेना पक्षाचे सर्व अधिकार मिळणार नाहीत हे स्पष्ट आहे अशी माहिती सूञाकडून मिळते आहे.
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळाले पाहिजे, असेही ते म्हणाले. शिवसेनेचे आमदार, खासदार, नगरसेवक शिंदे गटाकडे आले असले, तरी एकनाथ शिंदे यांना शिवसेना संघटनेवर नियंत्रण ठेवणे सोपे नाही.
पक्षांतर विरोधी कायद्या नुसार केवळ आमदार आणि खासदारांचे विभाजन म्हणजे पक्षात फूट पडणे असा होत नाही. त्यासाठी संघटनेत फूट पडली पाहिजे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना 188 सदस्य मिळाल्यास संपूर्ण पक्षातील मतविभाजनाचा दावा बळकट होणार आहे.तो शक्य नाही.
त्यानंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण शिवसेनेवर नियंत्रण ठेवू शकतात. अगोदरच उद्धव ठाकरे यांना या गोष्टीची कुणकूण लागल्यामुळे त्यांनी शिवसैनिकांना लढायला तयार राहा असे म्हटले होते शिवसेनेचा संघर्ष पेटला असुन त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यावेळी संघटना मजबूत करण्यावर भर देत आहेत
PM किसान 12 व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत प्रतीक्षा संपणार... या दिवशी मिळणार
0 टिप्पण्या