Breaking|जायकवाडी धरण 90% भरले| गोदाकाच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
नांदेड जिल्ह्यातील विष्णुपूरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न पडल्यामुळे विष्णुपूरीच्या जलसाठ्याची परिस्थिती गंभीरच होती. परंतु या आठ दिवसात पडलेल्या पावसाने जायकवाडी धरणात सध्यास्थितीत 85 टक्क्यांच्यावर पाणीसाठा झाला असल्याने या धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे व. गोदाकाठीच्या सर्व गावकऱ्यांना या संदर्भाने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा हा आता 84 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. या धरणातून सध्यास्थितीत जायकवाडीत पाण्याचा आवक चालूच असल्यामुळे गोदावरी पात्रात जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धक्कादायक घटना लोकांच्या डोळ्यांसमोर स्कार्पिओ गाडी नदीच्या पुरात पलटी झाल्याने पाच जण पुराच्या पाण्यात हजारो लोकांसमोर गाडीमध्येच जलसमाधी वाहून...
गोदावरी नदीकाठावरील सर्व गावांमध्ये दक्षतेचा इशारा दिला आहे. गोदावरी नदीवर असलेल्या जलमार्गात असणाऱ्या धरणांचे दरवाजे आवश्यकतेनुसार संचलीत करण्यात येत आहेत. असे स्थानिक प्रशासनाने सतर्क राहून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. वेळोवेळी कुठल्याही प्रकारची गरज पडल्यास जिल्हाधिकारी प्रशासनाच्या वरिष्ठ कार्यालयांना तो प्रसंग कळविण्याची सुचना केली आहेत
0 टिप्पण्या