परळी // राज्याच्या सामाजिक न्याय मंत्रीपदाचा पदभार
सांभाळल्यानंतर पहिल्यांदाच प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनला
गेले होते त्या प्रसंगी ते म्हणाले की,मी आज प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद
घेतले, दर्शन घेतल्यानंतर आज खऱ्या अर्थाने कामाची
सुरुवात झाली अशी मनात भावना आहे
जेव्हा प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक झालो तेव्हा या
मंदिराचे नाव देशभर होवो ही इच्छा प्रकट केली. माझ्या
श्वासात श्वास आहे तोपर्यंत प्रभू वैद्यनाथ मंदिराला
ज्योतिर्लिंगाचा दर्जा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करेन.
त्यासाठी हायकोर्टात जावं लागलं तरी चालेल
पर्यटनाच्या दृष्टीने परळीचे नाव मोठे करणे हे माझे स्वप्न
आहे. त्यासाठीच या तीर्थ क्षेत्राचा विकास करणे महत्त्वाचे
आहे. या उपक्रमासाठी किती ही निधी लागला तरी चालेल
प्रसंगी केंद्रात जावू पण या तीर्थक्षेत्राचा विकास
केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
Social Plugin