Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सावधान....! परळी तालुक्यात चोरट्यांचा धुमाकुळ , जिरेवाडी व दाऊतपूर...मध्ये चोरी;ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढली...



परळी//परळी ग्रामीण पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढली आहे . परळी तालुक्यात चोरट्यांचा धुमाकुळ दाऊतपूर येथे मध्यराञी दरम्यान काही चोरांनी चोरी करून तेथील लोकांना मारहाण केली . 

तालुक्यातील  गंगाखेडरोडवरील  दाऊतपूर परिसरात  येथे सोमवारी दि.१९  पहाटे १२.२० वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दोन शेत आखाड्यावर धुमाकुळ घातला. गावातील राधाबाई वैजनाथ बिडगर व त्यांचा मुलगा दशरथ बिडगर यांना बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. यातील राधाबाई यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या घरातील रोकड चोरट्यानी पळवून नेली.

यानंतर चोरट्यांनी दाऊतपूर जवळील शिवसेनेचे कार्यकर्ते राजा पांडे यांच्या पेट्रोल पंपाकडे मोर्चा वळविला. परंतु तेथील कामगारांनी त्यांना हुसकावून लावल्याने चोरटे तेथून पसार झाले. तसेच ताटीपामल यांच्या आखाड्यातही चोरटे घुसले होते. दररोज दाऊतपूरकडे पोलिसांची रात्री ची गस्त असते नेमके चोरीच्या रात्री नव्हती अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, नातेवाईकांनी फिर्याद देण्यासाठी जखमींना परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले होते. परंतु, पोलिसांनी जखमींना परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. अधिक उपचारासाठी येथून जखमींना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.तसेच 
प रळी तालुक्यात  वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी  आणि  प्रशासकीय कार्यालयातील प्रशासकीय यंत्रणा यांचे पोलिस संपर्क म्हणून असणारे फोन नंबर  कार्मयारी महत्त्वाचे फोन सुध्दा ही मंडळी जाणीवपूर्वक बंद ठेवत आहेत .यामुळे कठीण प्रंसगात अन्याय होणाऱ्या व्यक्तीने कुणाकडे न्याय मागायचा व मोठी संकट  कशी टाळावे असा प्रश्न ग्रामीण भागातील जनसामान्यांना पडला आहे .