Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक ! मोबाईलवर बोलत जिना उतरताना पडल्यामुळे एका नवविवाहीत तरुणीला आपला जीव गमवावा लागला..


 औरंगाबाद // मोबाईलवर बोलत जिना उतरताना तोल जाऊन पडल्यामुळे एका नवविवाहीत तरुणीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना औरंगाबाद शहरामध्ये घडली आहे. ही घटना गंगापूर जहाँगिर येथे घडली. मोबाईलच्या अतिरेकामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. मोबाईलवर बोलत असताना काहींना भानही रहात नाही त्यामुळे प्रसंगी जीव ही गमवावा लागतो.
मुस्कान रामअवतार कुर्मी (वय-२५) असे मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. मुस्कान फोनवर बोलत जिना उतरत होती. त्यावेळी तीचा तोल गेल्याने ती खाली कोसळली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुस्कानला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुस्कान आणि रामअवतार कुर्मी हे मुळचे मध्यप्रदेश मधील रहिवाशी आहेत. त्यांचा तीन महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. रामअवतार हा कामाच्या शोधात औरंगाबादमध्ये आला होता. नवविवाहीत जोडपे जहाँगिर येथे एका भाड्याच्या खोलीत राहत होते. रामअवतार हा एमआयडीसीमध्ये एका खासगी कंपनी कामाला लागला होता.
५ जून रोजी रात्री आठच्या सुमारास मुस्कान नातेवाईकांसोबत फोनवर बोलत जिना उतरत होती. त्यावेळी तिचा पाय निसटल्याने ती जिन्यावरून खाली कोसळली. मुस्कानला तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  पुढील तपास चिकलठाणा पोलीस करीत आहेत.