जालना // नांदेड हुन अमृतसर ला जाणाऱ्या रेल्वेगाडी मध्ये एका प्रवाशाला डब्यात धूर दिसला...त्याने आग लागली असल्याची शंका व्यक्त केली...घाबरलेल्या प्रवाश्यांना लगेच डब्यातील साखळी ओढून गाडी थांबवली.या अफवेचा फटका.. आगीमुळे कधीही काहीही घडू शकते...अश्याच अफवेचा फटका नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस मधील प्रवाश्यांना बसला....आग ची अफवा आगी सारखीच पसरल्याने गाडी थांबताच प्रवाश्यांना आपल्या सामनासाहित गाडी बाहेर धाव घेतली...अनेकांनी आपले समान गाडीबाहेर फेकून उड्या मारल्या...गाडी अचानक थांबल्यामुळे गाडीचे पोलिस गार्ड व पेंट्री कार कर्मचारी यांनी खाली उतरून पाहणी केली...मात्र कसल्याही प्रकारचा धूर आणि आग दिसली नाही...गाडीची पूर्ण तपासणी केल्यानंतर 13 मिनिटात सचखंड एक्सप्रेस पोलिस गार्ड ने प्रवाश्यांची समजूत घालत विश्वास देऊन ...त्या नंतर प्रवाशी गाडीत बसले आणि गाडी औरंगाबाद कडे रवाना झाली...ही घटना जालना बदनापूर रेल्वे स्टेशन दरम्यान घडली..एका खोडसळ प्रवश्यामुळे काही क्षणार्धात घाई गोंधळ गडबडीत अनेकांनी रेल्वे डब्या बाहेर पडण्याची घाई केली .सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा पोहचली नाही...मात्र गाडी 10-15 मिनिटांनी उशिरा धावली परंतु मनमाड ला राइटटाइम पोहचेली.
Social Plugin