Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Breaking ! आता सरकारच पाडणार "पाऊसं'...सुयोग्य ढगांचा शोध सुरू ...कसा तर वाचा


राज्यातील मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात  30 कोटी रूपयांचे 'एरियल क्लाऊड सीडिंग 'करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यास सरकार सज्ज ...

औरंगाबाद // मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत पर्जन्यवाढीसाठी एरियल क्लाऊड सीडिंगची (Arial Cloud Seeding) उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राज्यात अत्यअल्प पाऊस पडल्याने यंदा दुष्काळी परिस्थिती असून बहुतांशी भागांमध्ये पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अशा वेळी पर्जन्यमानात वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या पातळीवर विविध उपाययोजना करण्यासाठी विचारविनिमय सुरु आहे. कृत्रिम पर्जन्यमान हा त्यातलाच एक भाग आहे.
सुयोग्य ढगांची उपलब्धता बघून राबविण्यात येणाऱ्या या उपाययोजनेबाबत अगोदरच निर्णय घेऊन पूर्वनियोजन करणे आवश्यक असल्याने मंगळवारी मंत्रिमंडळाने एरियल क्लाऊड सीडिंग करून पर्जन्यवाढ करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी 30 कोटी रूपयांच्या खर्चाच्या प्रस्तावासही मंजुरी देण्यात आली आहे. परदेशात एरियल क्लाऊड सीडिंगच्या प्रयोगातून 28 ते 43 टक्क्यांपर्यंत पर्जन्यमान वाढल्याचे आढळून आले आहे.
राज्यातील मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त भागात क्लाऊड सीडिंगच्या माध्यमातून पाऊस पाडला जाणार आहे. त्यासाठी औरंगाबाद येथे सी बॅन्ड डॉपलर रडार आणि विमान सज्ज ठेवण्यात येणार आहे. दरम्यान २०१५ सालीही राज्यात राज्य सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग केला होता त्यावेळी २८ कोटी रुपये पाण्यात गेले होते.