Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अवैध नळकनेक्शन मुळे त्रस्त नागरिकांचे आमरण उपोषण.; प्रशासनाच्या वतीने पाण्याची नियोजन युद्ध पातळीवर सुरू..



परळी// पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनला मनमानी व अवैध पद्धतीने कनेक्शन घेतल्यामुळे जुनेरेल्वे स्टेशन,च्या भागात तसेच मिलिंद नगरच्या काही भागात पिण्याचे पाणी येणे गेल्या महिन्यापासून अचानक बंद झाले आहे, या बाबत परळी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा या भागातील पाण्याची अडचण नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सोडवली नाही,नागरिक गेल्या महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी, संर्घष करीत आहेत.
 राजकारणामुळे या भागातील जनतेला त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित केल्या जात आहे,
या सर्व त्रासाला कंटाळून या भागातील नागरिकांनी आज परळी नगर परिषदेच्या समोर  सहकुटुंब आमरण उपोषणास बसले आहेत.

सध्या जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळ पडला आहे, या परिस्थितीत पाण्याची तीव्र टंचाई सुरू आहे, प्रशासनाच्या वतीने पाण्याची नियोजन युद्ध पातळीवर सुरू आहे याचाच एक भाग म्हणून शहरी भागास एका व्यक्तीस एका दिवसाला 40 लिटर एवढे पाणी देण्यास नगर परिषदेस आदेशात केले आहे.

 परळी नगर परिषदेच्या वतीने जवळपास 30 टँकर सुरू केले आहेत. पण या प्रमाणे नागरिकांना कधीच पाणी दिले जात नाही, मग एवढे पाणी जाते कुठे? अशी चर्चा सध्या परळीच्या नागरिकात जोर धरत आहे.

असा सवाल या भागातील नागरिक व उपोषणकर्ते  यांनीही केला आहे.