Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

या कारणांमुळे घडला अनर्थ! गुप्तचर यंत्रणेकडून 'हाय अ‍ॅलर्ट' आला असतानाही, सुरक्षा यंत्रणा इतकी गाफील का

श्रीनगर महामार्गावरील एका भागातून @ @स्थानिकांच्या वाहनांना वाहतुकीची परवानगी देणं घातक ठरलं,


 दिल्ली //गुप्तचर यंत्रणेकडून 'हाय अ‍ॅलर्ट' आला असतानाही, सुरक्षा यंत्रणा इतकी गाफील का आणि कशी राहिली?, अशी शंका अनेकांच्या मनात आहे. अडीच हजार जवानांचा ताफा येत असताना यंत्रणा सतर्क का नव्हती?, स्फोटकांनी भरलेली गाडी या रस्त्यावर आलीच कशी?, असे प्रश्नही विचारले जाताहेत. त्या संदर्भातील खुलासा एका अधिकाऱ्यानं  केला आहे.

गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्यानुसार, सीआरपीएफचा ताफा ज्या रस्त्याने जाणार होता, तिथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु, जम्मू-श्रीनगर महामार्गावरील एका भागातून स्थानिकांच्या वाहनांना वाहतुकीची परवानगी देणं घातक ठरलं, अशी माहिती सीआरपीएफचे महानिरीक्षक (ऑपरेशन्स) कश्मीर जुल्फिकार हसन यांनी दिली. रोड ओपनिंग पार्टीने गुरुवारी सकाळी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली होती. या मार्गावर कुठेही स्फोटकं सापडली नव्हती. तसंच, जवानांच्या ताफ्यावर गोळीबार होऊ नये, हँड ग्रेनेड फेकली जाऊ नयेत, यादृष्टीनेही पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. परंतु, काश्मिरी नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून महामार्गाच्या एका भागातून त्यांच्या गाड्या नेण्यास संमती देण्यात आली होती. या सोयीचा (गैर)फायदा घेत जैश-ए-मोहम्मदचा आत्मघाती दहशतवादी आदिल अहमद सर्व्हिस रोडवरून राजमार्गावर आला आणि अघटित घडलं, याकडे हसन यांनी लक्ष वेधलं. अशा प्रकारचा हल्ला याआधी झाला नव्हता, पण यापुढे आम्ही आमची रणनीती बदलू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली