नांदेड// येथिल इलेक्ट्रॉनिक मीडिया व वृत्त पत्राचे काही प्रतिनिधी न्यायालयात हजर राहून डांबर घोटाळा करणाऱ्या आरोपींना न्यायालयात हजर केले असतात बातमी साठी आले होते पण संतप्त असलेले आरोपीचे नातेवाईक काही टोळक्याने पत्रकार वर हल्ला चढवला त्या मुळे पत्रकार सुरक्षा कायदा अस्तित्वात आहे की अशी एक अडचण दिसत आहे ह्या भ्याड हल्ल्याने पत्रकारिता करणार्यांवर भीतीची लाट पसरले आहे
दि ३ सप्टेंबर रोजी वृत्त संकलनासाठी कोर्ट परिसर नांदेड येथे पत्रकार गेले असता डांबर घोटाळ्यातील आरोपी चा मुलगा व त्याच्या अन्य साथीदाराने स्थानिक वाहिनीचे पत्रकार प्रवीण देशमुख यांना मारहाण केली . जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रवीण कंधारे यांना शिविगाळ केली आहे तर कुँवरचन्द मंडले पत्रकार, न्यूज नेशन यांचा कॅमेरा फोडला. वजीराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
बांधंवावर हल्ला चढविला
पत्रकार शुट करत असताना कॅमेरा हिसकावून घेऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली त्या मुळे पत्रकार संघटने कडून पोलिसांना निवेदन देऊन त्यांना तात्काळ अटक करावी असे त्या निवेदनात नमूद केले व गुन्हा दाखल करन्याची मागणी केली या वेळी प्रकाश कांबळे,जोशी,नागापुर कर,रवी संगनवार इतर अनेक जण उपस्थित होते.दि ३० ऑगस्ट रोजी लातूर जिल्हा प्रतिनिधी जनमत च्या महिला पत्रकाराला अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग करण्यात आला असे पत्रकारिता करणार्यांवर हल्ले होत असतील तर त्यांना जीव मुठीत घेऊन सत्यता पत्रकारिता करावी लागत आहे पोलिस प्रशासनाने वेळीच ह्यावर आळा बसवून त्या पत्रकाना सुरक्षा द्यावी अशी चर्चा जनतेतून होत आहे
Social Plugin