**
तीर्थक्षेत्राचा होणार कायापालट
मुंबई //
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे कपीलधार तीर्थक्षेत्र विकासाला राज्य सरकारने आज दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून विविध विकास कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
राज्यातील ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्याची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली तीत राज्यातील इतर तीर्थक्षेत्रा बरोबरच कपीलधार तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजूरी देण्यात आली. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्वच्छतेवर भर देण्यात यावा, या ठिकाणी मंजूर झालेला निधी हा घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा यावर जास्तीत जास्त खर्च करावा, असे निर्देश देत राज्यातील सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या सुमारे 99 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.
शिखर समितीच्या या बैठकीत टाकळघाट (नागपूर), कपीलधार (बीड), श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदिर (जालना), आमला (अमरावती), श्रीक्षेत्र कोंडेश्वर (अमरावती), संत गाडगे महाराज जन्मभूमी (शेंडगाव, जि. अमरावती) या सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, खासदार रावसाहेब दानवे, आमदार रवी राणा, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन उपस्थित होते.
राज्यातील ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा आढावा घेऊन मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, विकास आराखडा तयार करताना घनकचरा व्यवस्थापनाचा त्यात समावेश आवर्जुन असावा. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्वच्छतेवर भर देऊन त्याचे पावित्र्य राखावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत श्रीक्षेत्र कपीलधार, जि. बीड येथे १० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून रस्ता, भिंत, सुशोभिकरण, भक्तनिवास, पाणीपुरवठा, अन्नछत्र सभागृह, संरक्षक भिंत, स्वच्छता गृहे, सभामंडप सजावट आदी कामे होणार आहेत.
••••
तीर्थक्षेत्राचा होणार कायापालट
मुंबई //
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे कपीलधार तीर्थक्षेत्र विकासाला राज्य सरकारने आज दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून विविध विकास कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
राज्यातील ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्याची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली तीत राज्यातील इतर तीर्थक्षेत्रा बरोबरच कपीलधार तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजूरी देण्यात आली. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्वच्छतेवर भर देण्यात यावा, या ठिकाणी मंजूर झालेला निधी हा घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा यावर जास्तीत जास्त खर्च करावा, असे निर्देश देत राज्यातील सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या सुमारे 99 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.
शिखर समितीच्या या बैठकीत टाकळघाट (नागपूर), कपीलधार (बीड), श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदिर (जालना), आमला (अमरावती), श्रीक्षेत्र कोंडेश्वर (अमरावती), संत गाडगे महाराज जन्मभूमी (शेंडगाव, जि. अमरावती) या सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, खासदार रावसाहेब दानवे, आमदार रवी राणा, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन उपस्थित होते.
राज्यातील ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा आढावा घेऊन मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, विकास आराखडा तयार करताना घनकचरा व्यवस्थापनाचा त्यात समावेश आवर्जुन असावा. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्वच्छतेवर भर देऊन त्याचे पावित्र्य राखावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत श्रीक्षेत्र कपीलधार, जि. बीड येथे १० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून रस्ता, भिंत, सुशोभिकरण, भक्तनिवास, पाणीपुरवठा, अन्नछत्र सभागृह, संरक्षक भिंत, स्वच्छता गृहे, सभामंडप सजावट आदी कामे होणार आहेत.
••••
Social Plugin