Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

त्या"हिंदूत्ववादी संघटनेवर बंदी घाला- अ.निं.स



  हा तपास न्यायालयाच्या देखरेखे खाली हवा  !

परळी वैजनाथ //.  महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला  तब्बल पाच वर्षे पूर्ण झाले तरी सुध्दा मारेक-यांना अद्याप अटक न  झाल्यामुळे जवाब दो ! जवाब दो!! जवाब दो !!!  सोमवारी  निदर्शने करण्यात आली
 याप्रसंगी या राज्यात अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ . नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सचीन अंदूरे याला अटक करण्यात आली असून, सीबीआयने मुख्य सुञधार डॉ विरेंद्र तावडे यांनी केलेली आहे  असे सांगितले जाते. डॉ गोविंद पानसरे यांची हत्या झाली , यादोन्ही घटना सारख्याच आहेत  पोलीस प्रशासनने व सरकारने या हत्या प्रकरणांच्या याचिकांवर जेव्हा सुनावणी करण्याची वेळ येते , तेव्हा हे सर्वंच प्रकरणांच्या बाबत न्यायालयाच्या समक्ष ..आणि न्यायधिशांच्या   देखरेखीसाठी संपूर्णपणे तपास करण्यात यावी .
   महाराष्ट्रात गेली पाच वर्षांपासून हत्या खून,  दडपशाही , धमक्या , करण्याचे गुन्हेगारीची सातत्याने वाढ होत चालली आहे . बहुतांश कट्टर धर्मवादी संघटनेकडून महाराष्ट्रातील पुरोगामी साहित्यकार  , सामाजिक विचारवंत, लेखक , लेखिका , सामाजिक विचारांवर फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचार  प्रसार-प्रचार करणारे विचारवंताचा राजरोषपणे या राज्यात हत्या करण्याचे षडयंञ चालूच आहे. परंतू त्या कट्टर धर्मांच्या नावावरून समाजात दहशतवाद निर्माण केला आहे यातूनच पुरोगामी विचारवंताची सुध्दा हत्या , खून, धमक्या , दडपशाहीचे कृते चालू आहे . तरुण युवकांची माथे भडकवण्याची कट कारस्थान  सुरु केली आहेत .

 महाराष्ट्र सरकारने या हत्येप्रकरणी  तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता एटीएस पथक यांना अखेर पाच वर्षानंतर यश मिळाले आहे . महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये गोळीबार कशाप्रकारे चालविण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले  त्यांना संपूर्णपणे कोणात्या ठिकाणाहून कशी गोळी मारल्यास व्यक्ती जागीच मृत्यू होईल यांची सुध्दा तंतोतंत माहिती देण्यात आली
 राज्यात हिंदूत्ववादी व धर्मांच्या नावाखाली तरुणांच्या जीवनात दहशतवाद हत्या, खून, स्फोट घडविण्याचे प्रशिक्षण या संघटनेवर त्वरीत बंदी सरकारने घालावी . अन्यथा पून्हा या देशात व राज्यात हत्येचे कारस्थान चालूच राहील . आज महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या शाखा परळी-वैजनाथच्या वतीने तीव्रतेने जवाब दो!  जवाब दो!!  जवाब दो!! ! निदर्शने करण्यात आली
   याप्रसंगी  डॉ. नरेंद्र दाभोळकर , यांच्या मारेक-यांना तत्काळ अटक करावे .परळी न.प.माजी अध्यक्ष  बाजीराव धर्माधिकारी ,परळी न.प.चे उपनगराध्यक्ष आयुबभाई पठाण यानी केली आहे.
  माकपचे डॉ गोविंद पानसरे यांची हत्या केली  सामाजिक कार्य करणाऱ्यांना राजरोषपणे गोळी घालून ठार मारले, जात असून राज्यात पुरोगामी विचारवंताची खुन , हत्या  कॉ .पी.एस. घाडगे , असे मत यांनी मांडले .
 प्रा विलास रोडे ,प्रा .दासू वाघमारे , मिंलीद घाडगे , नवनाथ दाणे , मार्गदर्शक पञकार प्रेमदास कदम , श्रीकांत पाथरकर , पञकार .रानबा गायकवाड , रोहिदास बनसोडे यासर्वानी आपले मनोगत व्यक्त केले .यावेळी पोलिस प्रशासनाचे पोलिस .समाधान भाजीभाकरे यांना निवेदन देण्यात आले .
     तसेच अंनिसचे कार्यध्यक्ष प्रा .दशरथ रोडे, बाळासाहेब मुजमूले  ,रंगनाथ दहिवडे, बनसोडे एस.आर. अशोक वाघमारे , धम्मपाल कांबळे, 
आकाश सावंत, मारोती काळे , विजय भोयटे ,दिलीप  कराड,  आयुब मलिक खाँ, गोपाळ आंधळे , वामन टेहरे, प्रताप साळवे , बाळासाहेब गंगाधरे, अनंत इंगळे , पञकार गणेश आदोडे, ओमप्रकाश सारडा, पञकार दत्ताञय काळे , पञकार  मोहन व्हावळे,  सर्वं पदाधिकारी उपस्थित होते .