आपला ई पेपर
अंबड तालुक्यात मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. GR |मात्र सरकारने 'वंशावळ दस्तावेजा'ची अट रद्द करुन, सुधारीत GR |अध्यादेश काढावा, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू ठेवले होते. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंच्या घोषणेनंतर सरकारचा अधिकृत GR |जीआर घेऊन अर्जुन खोतकर आज उपोषणस्थळी पोहोचले
यावेळी बोलताना मनोज जरांग पाटील यांनी म्हटले की, आमचे शिष्टमंडळ मुंबईला जाऊन सरकारशी जीआरसंबंधित चर्चा करेल. जोपर्यंत सुधारणा केलेला जीआर येत नाही, तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. याशिवाय सरसकट मराठा समाजाला कुणबी आरक्षण द्यावे, ही आमची मागणी आहे. तसेच वंशावळ शब्द आहे तो काढून टाकावा, अशी मागणी मनोज जरांग पाटील यांनी केली आहे.
Social Plugin