शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा कैलास नाईकवाडे
परळी तालुक्यांत परतीच्या पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत ,
परळी तालुक्यातील सर्वच मंडळामध्ये परतीच्या पावसाने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, मका तूर आदींचा समावेश आहे नु क सा न झाल्याने पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी परळी चे शिवसंग्राम शहर अध्यक्ष कैलास नाईकवाडे पाटील यांनी केली आहे
0 टिप्पण्या