प्रत्येकामध्ये औदार्याची भावना नसते -पो. नि, उमाशंकर कस्तुरे
परळीतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, श्रीमंत लोक खूप आहेत पण प्रत्येकामध्ये औदार्याची भावना नसते आणि सामाजिक जाणीव. आज मान्यवरांच्या उपस्थितीत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. परळीत गोविंदा एंटरप्रायझेस या नावाने नवीन पुस्तके, जुनी-नवी पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य विकणाऱ्या विश्वंभर देशमुख यांनी मोठ्या कष्टाने स्वत:चे दुकान सुरू केले आहे
पण तो मोठा व्यावसायिक नसला तरी समाजकार्य करण्यासाठी त्याची नेहमीच धडपड असते. कोरोनाच्या काळात दोन वर्षांचा अपवाद वगळता त्यांनी हा सामाजिक उपक्रम अव्याहतपणे सुरू ठेवला आहे. आज मान्यवरांच्या उपस्थितीत ३७ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
newsmajha: 📣#SHIVSENA | या संघर्षात गेम कोणाचा वाजणार | धनुष्य बाण आणि शिवसेनाचे खरा वारसदार कोण | तर वाचा..|
https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_63.html#.YsfUxeK3e4I.whatsapp
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते डॉ.संतोष मुंडे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे, युवासेना जिल्हा संघटक प्रा.अतुल दुबे, विजय सामत, अभिनव विद्यालयाचे सचिव साहेबराव फड, ज्ञानबोधिनी शाळेचे मुख्याध्यापक , श्रीराम फड, चारुदत्त करमळकर, संपादक बाळासाहेब फड, पत्रकार अनंत कुलकर्णी, पत्रकार महादेव गित्ते, विष्णू मुंडे, कांबळेसर, आदी यावेळी उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार पद्माकर देशमुख, प्रशांत देशमुख, प्रा. देशमुख, आनंदराव कुलकर्णी, अशोक कुलकर्णी, गिरीश प्रयाग, रत्नाकर कुलकर्णी, चेतन शर्मा, उमेशराव नागापूरकर, रमेश पुरभैये, सचिन गोंडगे यांनी केले.
newsmajha: सर्वोच्च न्यायालयाच्या "या"निर्णयावर नवीन सरकारचे भवितव्य अवलंबून... https://bit.ly/3yUxxU1
Social Plugin