मुंबई //राज्यातील सर्वच विभागातील कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना (GPF) लागु होण्यासाठी 9 सप्टेंबर रोजी होणा-या संपात
जुनी पेंशन योजना (GPF) ही भविष्यातील म्हातारपणाच्या आधाराची मजबूत काठी असुन 2005 पुर्वी सेवेत रुजू झालेल्या टप्पा अनुदाना वरील कर्मचा-यांना जुनी पेंशन योजना नाकारुन कर्मचा-यांवर अन्याय केला आहे. तसेच मृत पावलेल्या कर्मचा-यांच्या पाल्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ अजुनही मिळाला नाही परिणामी विद्यादानाच्या पवित्रक्षेत्रात सेवा देणा-या मृत कर्मचारी बांधवांचा संसार उघड्यावर पडलेला आहे.
विविध निवेदने, मोर्चे, आंदोलने करूनही सरकार कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने आता, राज्य शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, महसूल सह जिल्हा परिषद व महापालिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोमवारी एकदिवसीय संपावर तर सरकारने दुर्लक्ष केल्यास बुधवार पासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
शिक्षक दिनी कर्मचाऱ्यांणी काळ्या फिती लावूंन सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला पण सरकारने दखल घेतली नाही. आता हा संप राज्यातील प्रमुख ३५ हून अधिक संघटनांनी पुकारला आहे. अशी माहिती जुनी पेन्शन हक्क संघटनेने दिली आहे.
२००५ पासून लागू केलेली अंशदायी (DCPS) पेन्शन योजना ही कुटुंब व्यवस्था उध्वस्त करणारी फसवी योजना आहे. सेवेत असताना मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला कोणताही आधार सरकार देत नाही. अशा अनेक कुटुंबावर भीक मागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ही नवी योजना रद्द करण्यासाठी गेली चौदा(१४ )वर्षे राज्यातील २००५ नंतर नियुक्त सर्व विभातील कर्मचारी व संघटना प्राणपणाने कोर्टासह रस्त्यावर ही लढत आहेत.
'समान काम समान वेतन' या तत्वाचा विचार करून "जुनी पेन्शन योजना सरसकट लागू करावी" ही प्रमुख मागणी या सर्व संघटनांनी केली आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व संवर्गातील सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर कराव्यात, कंत्राटी धोरण बंद करून रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत, अनुकंपा भरती तात्काळ व विनाअट करावी, केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती बाल संगोपन रजा व अन्य सवलती लागू करणे, राज्यातील सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदोन्नती शैक्षणिक पात्रतेनुसार करण्यात यावी, शिक्षण व आरोग्य यांचेवर जीडीपीच्या सहा टक्के खर्च करण्यात यावा व आरोग्य सेवेचे खासगीकरण बंद करावे, सर्व कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा साठवण्याची कमाल मर्यादा काढण्यात यावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत, आरोग्य विभागातील कामाचे तास निश्चित होईपर्यंत बायोमेट्रिक प्रणाली आणू नये आदी मागण्यासांठी आंदोलन करण्यात येणार आहे.
पंजाब व तमिलनाडु सरकारने राज्यातील कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागु केली आहे. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात दिल्ली सरकारने दि.26 नोव्हेंबर रोजी सर्वच कर्मचा-यांना जुनी पेन्शन लागू करण्याचे विधेयक पारित करुन केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी सुद्धा पाठविले आहे तसेच केरळ सरकारनेही 1नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या सर्वच कर्मचा-यांसाठी जुनीच पेन्शन (GPF) लागू केली आहे.
Social Plugin