परळी // सध्या परळीत पाणीटंचाईने हाहकार माजला असून पिण्याच्या पाण्यासाठी परळीकरांच्या डोळ्यात पाणी आणले आहे .एकेकाळी परळी पाण्यावरील परळी असे म्हटले जात होते परंतु आज परिस्थिती उलटी झाली आहे .पाण्यावर परळी म्हणणाऱ्या म्हणीला आता पूर्णविराम मिळाला असून .
तासन्तास पाण्याच्या रांगेत उभे राहून दोन हंडा पाण्यासाठी परळीकर त्रासले असून
पाण्यासाठी त्रासलेली परळी अशी ओळख सध्या निर्माण झाले आहे.
अनेक नेतृत्व परळीतील पाणीटंचाईसाठी सतत संघर्ष करत आहेत वेगवेगळे माध्यमातून पाणीटंचाईवर मार्ग काढत आहेत परंतु निसर्गाने सुध्दा परळी तालुक्यावर डोळेझाक केल्याने .परळीकरांच्या डोळ्यात अश्रू एवढे सुद्धा पाणी शिल्लक राहिले नाही ही दुर्दैवी बाब परळीतील विटभट्ट्या ने ओढवली असून या सर्व समस्यांचे जबाबदाऱ्या परळी प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहेत असे म्हटले जात आहे
Social Plugin