परळी // गोदावरी नदीवरील खडका बंधार्यातुन परळीकरांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून प्रभू वैद्यनाथाला जल अभिषेक करून माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक दिपक देशमुख यांचे आमरण उपोषणाला सुरुवात पिण्याच्या पाण्यासाठी परळी येथील थर्मल पावर स्टेशन ला पाणी पुरवठा करणाऱ्या खडका येथील बंधाऱ्यातील पाणी मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगर अध्यक्ष तथा विद्यमान नगर सेवक दीपक देशमुख यांनी परळीकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी परळीच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले असून जोपर्यंत परळीकारांना पाणी दिले जात नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण बंद केले जाणार नाही.
या उपोषणाला परळीच्या सर्व स्थरातील नागरिक तथा कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा दिला आहे.
३१ जुलै रोजी औरंगाबाद खंडपीठात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याबद्दल याचीका दाखल करणार
परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाण धरणातील पाणीसाठा संपल्याने शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हीच परिस्थिती असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचीका दाखल केली होती. या याचिकेवर स्पष्ट सुनावणी देत परळी शहराला कोठून पाणीपुरवठा करायचा याचा निर्णय जिल्हाधिकारीच घेवू असा निर्वाळा दिला होता. परंतू अद्यापही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई झाली नसल्याने हा कोर्टाच्या निर्णयाचा अवमान असुन,
३१ जुन रोजी औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट निकाल देवून अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यामुळे येत्या ३१ जुलै रोजी औरंगाबाद खंडपीठात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याबद्दल याचीका दाखल करणार
Social Plugin