लोकप्रश्नांची क्रूर थट्टा |परळीत ठिकठिकाणी रस्त्याची झालेली दैना | नागरिकांची फसवणूक
---------------------------------------------------
परळी
---------------------------------------------------
परळी
राजकारणापेक्षा जनतेचे प्रश्न महत्वाचे नाहीत हेच यावरून वारंवार दिसून येत असले तरी जनताही एवढी राजकारणप्रिय झाली आहे की आपल्या समस्या अबाधित असतांना आगामी निवडणुकीत निवडून कोण येणार? यावर ठिकठिकाणी चर्चा होते. उखडलेल्या रस्त्याची चर्चा निघेल तेवढ्याच काळापुरती पुढाऱ्यांना, सत्ताधाऱ्यांना आणि गुत्तेदारांना शिव्यांची लाखोळी वाहायची, परंतु नेमक्या वेळेला आपले उपसलेले हत्यार म्यान करायचे! यामुळेच "काळ सोकावतो" आहे. पण जनता संवेदनशील आहे म्हणून त्यांच्याही मानसिकतेचा आणि सहनशीलतेचा अंत पाहणे म्हणजे हजारोंच्या भावनांशी खेळ आणि लोकप्रश्नांची क्रूर थट्टा आहे असेच म्हणावे लागेल.
Social Plugin