Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अपघात !.. प्रवासाच्या सुरुवातीला घेतलेला सेल्फी फोटो 'आठवण ' म्हणून आयुष्यातील शेवटचा सेल्फी ठरला !!



पुणे-बंगळुरू महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात ; औरंगाबादचे रहिवासी 'ते' ५ जण  जागीच ठार

कोल्हापूर // कारचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास बेळगाव शहरातील श्रीनगर गार्डनजवळ हा अपघात घडला. सर्व मृत हे औरंगाबादचे रहिवासी
... प्रवासाच्या सुरुवातीला घेतलेला सेल्फी फोटो  आठवण म्हणून   आयुष्यातील शेवटचा सेल्फी ठरला !!
औरंगाबाद येथून प्रवासाला निघालेल्या त्या सात जणांचा सेल्फी
हा त्यापैकी पाच जणांच्या जीवनातला अखेरचा सेल्फी ठरला आहे बेळगाव जवळ दुःखद अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.या सेल्फीतील त्यांचे हसरे चेहरे एक क्षणाच्या त्या अपघाताने
रक्ताने माखले होते तर जखमी दोघांची परिस्थिती गंभीर आहे.औरंगाबाद हुन त्यांचे नातेवाईक बेळगावला पोहोचण्याच्या  प्रयत्नात आहेत
नंद पवार वय 28,अमोल नीले 26, सुरेश कन्हेरे वय 29, अमोलचा वरे वय 26.महेश चावरे वय 28 सर्वजण रा औरंगाबाद अशीमयतांची नावे असून महेश पडळे गोपाळ पाटील दोघे गंभीरजखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादहून कारने सहा जण बंगळुरूला निघाले होते. कार श्रीनगर गार्डनजवळ आली असता तिचे समोरील टायर फुटले. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व ती थेट दुभाजककावरून पलीकडील रस्त्यावर गेली. यावेळी धारवाडहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले तर दोनजण गंभीर जखमी झाला. जखमीवर केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

..