Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

खास परळीकरांसाठी ! " जल है तो कल है" या उपक्रमांतर्गत उन्हाळ व पाणी टंचाई लक्षात घेऊन विशेष उपक्रम --चंदुलाल बियाणी


परळी शहरात फुटलेल्या जलवाहिनी व गळती थांबविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु


परळी  // राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांच्या पुढाकारातून परळी शहरातील अंतर्गत जलवाहिनीवर असलेली पाण्याची गळती थांबविण्यासाठी जल है तो कल है या उपक्रमांतर्गत उन्हाळ व पाणी टंचाई लक्षात घेऊन विशेष उपक्रम हाती घेतला आहे. एका पथकाद्वारे फुटलेल्या जलवाहिनी जोडण्यात येत असून पाण्याची गळती थांबविणे ही सुद्धा एक पाण्याची मोठी बचत असल्याचे मत अ‍ॅड. जिवनराव देशमुख यांनी व्यक्त केले. दरम्यान, आपण संपुर्ण शहरातील सार्वजनिक जलवाहिनीवर असलेली गळती थांबविण्यासाठी प्रयत्न करत असून नागरिकांनी आपल्या भागात गळती होत असेल तर आम्हाला कळवावे, आमचे पथक त्वरित तेथे पोहचेल असे चंदुलाल बियाणी यांनी सांगीतले.


महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभुमीवर न.प. सदस्य चंदुलाल बियाणी यांनी हाती घेतलेल्या नळ गळती थांबविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांसह या कामावर विशेष लक्ष ठेऊन असणारे प्लंबर समदभाई यांनी मार्गदर्शन केले. चंदुलाल बियाणी यांनी हाती घेतलेला हा उपक्रम महत्वाचा असून आम्हाला जिथे माहिती मिळेल तिथे जाऊन आम्ही वेल्डींगद्वारे जलवाहिनीची गळती थांबविणार आहोत. शहरातील अनेक भागात अंतर्गत पाईपलाईन काही ठिकाणी फुटल्याचे दिसत असून ही गळती थांबविल्यास उपयुक्त पाणी साठा वाढविता येईल असे ते म्हणाले. नागरिक म्हणून आपल्या काही या संदर्भात सुचना असतील तर समदभाई प्लंबर मोबा.9823310257, अनिल जठार 9730305999, ओम काळे 8888144677 येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
उन्हाळा आणि पाणी टंचाई लक्षात घेऊन जलवाहिनींवरील पाण्याची गळती थांबविण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर परळी शहरात चालू आहे. प्लंबरसह 8 जणांचे पथक या संदर्भात विशेष काम करीत आहे. जेथून सुचना मिळेल तेथे हे पथक पोहचत असून तातडीने जलवाहिनीवरील लिकेज दुरुस्त करण्याचे काम केले जात असल्याचे बियाणी यांनी सांगीतले. भविष्यातील पाऊस व पाणी बचत करण्यासाठी पुनर्भरण हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्लंबर समदभाई या संदर्भात मार्गदर्शन करुन माफक दरात पुनर्भरणाची सुविधा देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले.