शौर्यची ..गाथा अन् भारताचा विजय ; विंग कमांडर अभिनंदन
वाघा // अखेर पाकिस्तानला भारताच्या दबावापुढे झुकावं लागलं...
@ आजचा शुक्रवार तमाम भारतीयांकरिता ऐतिहासिक दिवस असणार आहे. अभिनंदनच्या सुटकेच्या बदल्यात भारतावर अटी घालण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत होता. मात्र, भारताने पाकिस्तानचे सर्व प्रयत्न धुडकावून लावले होते.
जिनिव्हा करारानुसार अभिनंदनला सोडणं पाकिस्तानला भाग होतं. तर पाकिस्तानचा दबावाचा प्रयत्न होता. भारताने आक्रमक भूमिका घेतल्याने पाकिस्तानला आणखी हल्ल्याची भीती वाटत होती. पाकिस्तानचा हा डाव भारताला माहित होता. त्यामुळे अशी कुठलीही अट भारताने मान्य केली नाही आणि अखेर पाकिस्तानला भारताच्या दबावापुढे झुकावं लागलं.
पाकिस्तानमध्ये असलेले भारतीय वायूदलाचे अधिकारी जेडी कुरियन यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यांच्यासोबत वाघा बाॅर्डरवरून अभिनंदन वर्तमान भारतात परतणार अभिनंदन यांच्या सुटकेमुळे भारतात जल्लोषाचे वातावरण आहे.
@
भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या F-16 या विमानाला पिटाळून लावताना भारताचं MiG-21 हे लढाऊ विमान कोसळलं होतं. विंग कमांडर अभिनंदन हा त्या विमानाचा पायलट होता. मात्र ऐनवेळी अभिनंदन यांच्या विमानातून धूर येऊ लागाला आणि विमानानं पेट घेतला. अभिनंदन यांनी पॅराशूटच्या साहाय्यानं उडी मारली. मात्र दुर्देवं ते पाकिस्तानच्या किल्लान हद्दीत उतरले.
भारतीय वायुसेनेचा विंग कमांडर अभिनंदन सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे. जेव्हा ते पाकिस्तानच्या धरतीवर पडले तेव्हा सुद्धा त्यांनी भारताचाच विचार केला. आपल्याजवळ असलेले सगळे पुरावे आणि चक्क नकाशे सुद्धा त्यांनी गिळले. याबाबतची माहिती पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्रात दिली आहे. हा भारतीय कूटनीतीचा मोठा विजय मानला जात आहे.
पाकिस्तानच्या किल्लान गावातील रझ्झाक या ग्रामस्थाने डॉन या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, पॅराशूटच्या सहाय्याने अभिनंदन जमिनीवर सुखरूप उतरले. त्यावेळी त्यांनी स्थानिकांना विचारलं हे पाकिस्तान कि हिंदुस्तान? यावर एका पाकिस्तानी नागरिकाने कपटाने उत्तर दिले हिंदुस्थान. या उत्तराने अभिनंदन एकदम खुश झाले आणि त्यांनी हिंदुस्थान झिंदाबादची घोषणा द्यायला सुरूवात केली. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी चिडून त्यांच्यावर हल्ला केला. बचावासाठी अभिनंदन अर्धा किमी पळाले. यावेळी त्यांनी हवेत गोळीबार केला. पळता पळता त्यांनी एका तळ्यात उडी घेत जवळील कागदपत्र गिळून टाकले. स्थानिकांनी त्यांना पकडून ठेवलं. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना मारहाण केली. किल्लान गावातील नागरिकांनी या घटनेची माहिती पाकिस्तानी सैन्याला दिली व त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले.
भारताचा विजय ; विंग कमांडर अभिनंदन यांची मुक्तता-
पाकिस्तानात अडकलेला भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन यांना सुखरूप मायदेशी (भारतात) पाठवणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत केली आहे. असल्याने भारतात जल्लोषाचे वातावरण आहे. अभिनंदन वर्तमान हे विंग कमांडर पदावर कार्यरत आहेत. त्यांनी 19 जून 2004 मध्ये भारतीय वायुसेनेत प्रवेश केला. अभिनंदन MiG21 बिसॉन विमानाचं सारथ्य करत होते. अभिनंदन यांचे वडील सिमहाकुट्टी वर्धमान हेही निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. ते एअर मार्शलपदी कार्यरत होते.
बुधवारी पाकिस्तानकडून घुसखोरी करण्यात आलेला F-16 या विमानाला परतवून लावताना भारतीय वायुसनकडून विमानांनी उड्डाण भरले होते. यात मिग -२१ या विमानाचा सामावेश होता. एकूण तीन विमानांपैकी एक विमान भारतात परतले नाही. हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पडले
Social Plugin