परळी // येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलना निमित्ताने महिला, बालकल्याण व ग्रामविकासमंत्री मा.ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटनप्रसंगी श्रीमती मुंडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मुला मुलींमध्ये भेद करणारी संस्कृती नसावी हा भेद आपण समूळ नष्ट केला पाहिजे असे प्रतिपादन श्रीमती मुंडे यांनी यावेळी केले. स्त्री पुरुष समानतेची आवश्यकता त्यांनी स्वतःच्या घरातील उदाहरणाने प्रतिपादन केली .मी स्त्री असूनही राजकारणात असल्याचा मला सार्थ अभिमान आहे . असेही त्यांनी सांगितले . स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तरच तिला सन्मानाची वागणूक मिळेल म्हणून मुलींनी खूप अभ्यास करून स्वतः समर्थ बनले पाहिजे असा मोलाचा संदेश त्यांनी दिला . त्यांनी स्वतःच्या जीवनाची संघर्ष कहानी सांगून " जिद तो उसे पाने की है जो मुकद्दर ने लिखाही नहीं " असा प्रेरक संदेश दिला
या कार्यक्रमास अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष संजयजी देशमुख, माजी आमदार विजयराव गव्हाणे, रविंद्रजी देशमुख, प्रा. प्रसाद देशमुख, माजी नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात पुढे बोलताना ना.मुंडे यांनी सांगितले की, समर्थ ,सशक्त व ओघवत्या शैलीतील वक्तृत्वाने लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या स्वप्नांना नवे बळ दिले.आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडणाऱ्या या रणरागिणीने महाविद्यालयाच्या स्नेहसंम्मेलनाचे उद्घाटन करून विद्यार्थिनींच्या युवा मनात प्रचंड उत्साह भरला. या प्रसंगी बोलताना . नुकतेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेले संस्थेचे सचिव मा.रवींद्रजी देशमुख यांचा सेवागौरव सोहळाही मा.ना.पंकजाताईंच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी श्री रवींद्रजी देशमुख व त्यांच्या अर्धांगिनी प्रा.डॉ.सौ.विद्याताई देशपांडे उभयतांचा मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रास्ताविकपर वक्तव्यात महाविद्यालयाच्या प्राचार्या, डॉ .आर .जे.परळीकर यांनी संस्थेच्या पायाभरणीपासूनच्या प्रगतीचा सविस्तर आढावा आपल्या वक्तव्यात घेतला. संस्थेच्या प्रगतीमध्ये ज्यांचा वाटा आहे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. श्यामरावजी देशमुख त्याचबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी , प्राध्यापक वृंद आणि या संस्थेच्या प्रगतीसाठी पदोपदी मार्गदर्शन करणारे माजी आमदार ॲड. विजयरावजी गव्हाणे या सर्वांच्या अनमोल सहकार्याने 85 विद्यार्थी संख्येपासून चालू झालेले हे महाविद्यालय आज प्रगतीचे उंच शिखर गाठलेले दिसून येते. यापुढील आपल्या वक्तव्यात नामदार पंकजाताईविषयी बोलताना त्या म्हणाल्या की पंकजाताईने आपल्या जीवनात मोठमोठी वादळे परतवून लावली आहेत.
याप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष मा. प्रसाद जी देशमुख यांनी
संस्थेच्या संपूर्ण प्रगतीचा आलेख त्यांनी आपल्या शब्दांमध्ये विस्तृत मांडला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ . एल . एस .मुंडे यांनी त्यांच्या वक्तव्यात एन एस एस संबंधीच्या सर्व कार्याचा विस्तृत आढावा घेतला. याप्रसंगी यशस्वी प्राध्यापकांचा माननीय नामदार पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये प्रा. डॉ.एल.एस. मुंडे ,प्रा. डॉ. विनोद जगतकर ,प्रा. डॉ.प्रविण दिग्रसकर ,प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड प्रा. डॉ. जोशी प्रा. चव्हाण ए. एम., प्रा. डॉ. मनीषा रोकडे ,प्रा. डॉ.ज्ञानोबा फड यांच्या सत्कारांचा समावेश होता. त्यानंतर महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला .त्यात कु.अर्चना यमगर, कु.शिंदे पायल, कु. शेळके जान्हवी, कु.शेख इब्तेजम, कु. सुरवसे मुक्ता, कु. शिवगण अनुराधा ,कु. अनघा खिस्ते, कु. मंजू शहाणे, हर्षदा परदेशी, योगेश्वरी रायभोळे, विद्या ओपळे , कु.कोमल, कु.मुंडे मोनिका ,कु. संगीता कु .शिवानी, कु.गौरी लंगोटे , गीता व गायत्री भानुसे, मस्के क्षितिजा , पाथरकरअनुजा या सर्वांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.राजकुमार यल्लावाड यांनी केले तर आभार प्रा. डॉ. विनोद जगतकर यांनी मानले .या कार्यक्रमासाठी परळी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. विद्यार्थिनींचा उत्साह वाखाणण्यासारखा होता .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
Social Plugin