@परळीतील व्यापाऱ्यांनी पहिल्यांदाच स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद ठेवले
परळी // अन परळीकर स्तब्ध झाले ...!
पुलवामा स्फोटात 40 वीरजवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली म्हणून ... ....!!! पाकिस्तान विरोधी जनप्रक्षोभ संपूर्ण भारतात उमटला परळीत ही आज सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापले व्यवहार, व्यापार बंद ठेवून निषेध नोंदवला . जम्मू कश्मीर येथील पुलवामा येथे घडलेल्या जवानांच्या ताफ्यावर अतिरेक्यांकडून हल्ला करण्यात आला त्यामध्ये 40 वीरजवान शहीद झाल्याची घटना घडली. आणि सारा भारत देश स्तब्ध झाला.
या बंदला परळीकरानी जाहीर पाठिंबा देत बंद पाळला. शहराच्या चौकाचौकात शहिदांच्या प्रतिमा लावून श्रद्धांजली वाहीलीआणि पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या .
Social Plugin