Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शिक्षणमंञी साहेब हेच का अच्छे दिन .. आमच्या शिक्षकांना पगार कधी मिळणार - विद्यार्थ्यांचा पञाद्वारे टाहो


डोंगरकिन्ही // जगात आदर्श लोकशाही असलेल्या भारत देशात शिक्षक जर विनावेतन उपासपोटी काम करत असतील , पगार मिळण्यासाठी त्यांना 18 वर्ष संघर्ष करावा लागत असेल, पगार मागण्यासाठी आंदोलन केले तर त्यांच्यावर लाठीमार करुन गुन्हेगार असल्यासारखे गुन्हे दाखल होत असतील , त्यांना हक्काच्या वेतनासाठी शासनाच्या विरोधात भीक मांगो आंदोलन करावा लागत असेल व शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आमच्या सरांना इतर शिक्षकाप्रमाणे 100% पगार कधी मिळणार त्यासाठी तुम्ही आणखी किती आश्वासन देणार हेच का अच्छे दिन असे विद्यार्थी जर पञ पाठवून शिक्षणमंञी यांना जाब विचारत आसतील तर ही शासनकर्त्यासाठी मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे.अशा निस्वार्थ पणे विद्या दानाचे काम करणाऱ्या गुरुंना शासनकर्ते ' शिक्षक दिनी ' कोणत्या तोंडाने शुभेच्छा देणार आहेत. की देखावा करणार आहेत .
महाराष्ट्रामध्ये गेल्या 18 वर्षापासून कायम विना अनुदानित शाळावर विनावेतन हजारो शिक्षक विद्यादानाचे कार्य करत आहेत. 2009 मध्ये अशा शाळांचा कायम शब्द काढून त्यांना अनुदान देण्याचा निर्णय शाननाने घेतला. तेव्हापासून आजपर्यंत सर्वच शाननाने अनुदान देण्यासाठी चालढकल पणा केला. लाखो करोडो रुपयांचे कामाच्या निवीदा साठी एवढे कडक नसतील तेवढे कडक नियम आसणारे आदेश काढले गेले. एखाद्या गुन्ह्यामध्ये सुध्दा चोरांच्या एवढया फेरतपासण्या होत नसतील तेवढे कडक नियम लावूनही शाळा पाञ झाल्या तरीही त्यांना अनुदान मिळण्यासाठी आंदोलने करावे लागतात. तर काहीं शिक्षकांनी यासाठी  आत्महत्येचा मार्ग अवलंबला. कौटूबीक कलह सहन करत पती-पत्नी वाद ,लहान मुलांचे स्वप्न धुळीला मिळवली स्वतःच्या स्वप्नांची राख रांगोळी करत 18 वर्ष प्रचंड मेहनत घेवून शाळा जिवंत ठेवल्या. उपासपोटी शिकवत आहोत हे विद्यार्थ्यांना कधी कळू दिलं नाही. हसत खेळत विद्यार्थी घडवले त्यांच्या हाताखालून गेलेले कित्येक  विद्यार्थी आज शासकीय सेवेत उच्च पदावर  आहेत त्यांना पाहूनच शिक्षक विनावेतन केलेली सेवा विसरुन जात आनंदाने सेवा समर्पित करतो. किती करायचे यालाही काही मर्यादा असते. शिक्षकांची ही व्यथा आता विद्यार्थ्यांना पहावत नसल्यामुळे अशा शाळेमधील मुले शिक्षणमंञी , मुख्यमंत्री यांना पञ लिहून विनंती करत टाहो फोडत आहेत कधी मिळणार आमच्या शिक्षकांना 100%  पगार ? आणखी किती आश्वासने देणार ? आता त्यांचे हाल आम्हाला पहावत नाहीत ? असे विद्यार्थी पञ लिहून विचारत आहेत ही वेळ महाराष्ट्रात विद्यार्थ्यांवर येते ही शासनाला विचार करायला लावणारी गोष्ट आहे.शिक्षक हा राष्ट्र निर्माता आहे हे जगाने मान्य केले आहे . यांना छळून तुम्ही कोणते सत्कर्म करत आहात. हेच का होते तुमचे अच्छे दिन !!